“हे इतके भावनिकतेने घेऊ नका.”'कॉक्रोच जनता पार्टी'शी संबंधित याचिकेच्या तातडीच्या सुनावणीला सरन्यायाधिशांचा नकार…
भारताचे सरन्यायाधिश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या विधानानंतर उदयाला आलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची सध्या सोशल मिडियावर चांगलीच क्रेझ आहे. केवळ तरुणांकडूनच नव्हे तर अनेक राजकिय पक्षांकडून या नव्या पॉलिटिकल पार्टीची दखल घेतली जात आहे. अनेक राजकिय नेत्यांकडून या पार्टीवर टीकाही केली जात आहे.
सरन्यायाधिश आणि पार्टीची स्थापना
भारताचे सरन्यायाधिश सुर्यकांत यांनी तरुणांबद्दल केलेल्या त्या विधानामुळे कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. सरन्यायाधिश यांनी एका खटल्यावेळी भारतातले बेरोजगार तरुण मिडीया, सोशल मिडीयावर जातात, आरटीआय कार्यकर्ते बनतात आणि देशाच्या यंत्रणेवर हल्ले करतात असं वक्तव्य केलं होतं. यावर सोशल मिडीयावर अनेक संतप्त प्रतिक्रिया आल्या.
अनेकांनी सरन्यायाधिशांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. यानंतर अभिजीत दिपके या अमेरिकास्थित तरुणाने परदेशातूनच सोशल मिडीयावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना केली. बघता बघता या पक्षाची सदस्यसंख्या २ कोटींच्या वर गेली.
खंडपीठाचा तातडीच्या सुनावणीस नकार
सरन्यायाधीश कांत यांच्या नेतृत्वाखालील, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही. एम. पांचोली यांच्यासह एका खंडपीठाने म्हटले की, या प्रकरणात “कोणतीही गंभीर तातडी नाही” आणि याचिकांची योग्य वेळी तपासणी केली जाईल.
वकिलांनी न्यायालयासमोर दोन जनहित याचिका सादर केल्यानंतर ही टिप्पणी आली — एकामध्ये न्यायालयातील निरीक्षणांच्या कथित व्यावसायिक वापरावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती, तर दुसऱ्यामध्ये ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या उपहासात्मक मोहिमेसंबंधित कारवायांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
जेव्हा वकील एन. के. गोस्वामी यांनी असा युक्तिवाद केला की ऑनलाइन चळवळीमुळे न्यायपालिकेची प्रतिमा डागाळत आहे, तेव्हा सरन्यायाधीश म्हणाले: “हे इतके भावनिकतेने घेऊ नका.”
Comments are closed.