Salt Water : पाण्यात सैंधव मीठ टाकून अंघोळ केल्यास मिळतात हे फायदे
चवीसाठी पदार्थांमध्ये मीठ वापरले जाते. कोणताही पदार्थात मीठाचे प्रमाण कमी-जास्त झाले तर पदार्थाची चव खराब होते. यावरूनच आपल्या जीवनात मीठाचे महत्त्व किती आहे याचा अंदाज आपण घेऊ शकतो. चवीसोबतच मीठ शरीर आणि मन दोन्हींसाठी फायदेशीर आहे. साधारणपणे मीठाचे दोन प्रकार आहेत. एक साधे मीठ आणि दुसरं सैंधव मीठ. सैंधव मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट. या सैंधव मीठाचा वापर प्रामुख्याने उपवासासाठी करण्यात येणाऱ्या फराळांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. सैंधव मीठ आपल्या आरोग्यासाठी विविध पद्धतीने फायद्याचे ठरते. या मीठाचा वापर स्वयंपाकघरापासून ते अंघोळीपर्यंत करता येतो. सैंधव मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास अनेक शारीरिक व्याधी बऱ्या होऊ शकतात. त्यामुळेचला तर मग जाणून घेऊयात सैंधव मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास कोणते फायदे होतात.
फायदे –
- सैंधव मीठ हे एक नॅचरल पेनकिलर आहे. थोडक्यात सैंधव मीठामुळे वेदना कमी होतात.
- सैंधव मीठातील पोषक घटकांमुळे शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. ज्यामुळे शरीरातील अतिरिक्त विषारी पदार्थ सहजरित्या बाहेर फेकले जातात.
- या मीठाच्या पाण्याने अंघोळ केल्यास आपल्या शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो आणि लवचिकताही वाढते.
- गरम पाण्यात एक ते दोन मूठ मीठ टाकून अंघोळ केल्यास शरीराच्या स्नायूंना आराम मिळतो. तसेच शरीरावर साचलेली घाण साफ होते आणि मृतपेशीही निघून जातात.
- जर तुमची हाडे दुखत असतील तर पाण्यात सैंधव मीठ अवश्य टाका.
- सैंधव मीठाने वजन कमी होण्यास मदत होते. मीठ आपल्या शरीरातील ब्लॉक स्किन पोअर्स उघडतात, ज्यामुळे जास्त घाम येतो आणि फॅटही बर्न होतात.
- सैंधव मीठामुळे तणाव कमी होतो.
- सैंधव मीठ ब्लड सर्कुलेशन सुधारते, ज्यामुळे त्वचा चमकदार होते आणि त्वचेतील विषारी पदार्थ बाहेर पडतात.
आडवड्यातून किती वेळा मीठाने अंघोळ करावी?
तुम्ही सैंधव मीठाच्या पाण्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा अंघोळ करू शकता. यामुळे शरीराचे कोणतेच नुकसान होत नाही, उलट फायदाच होतो.
हेही पाहा –
Comments are closed.