“खरं सांगू तर मी आनंदी…” आरसीबीकडून पराभूत झाल्यावर इशान किशनचे खळबळजनक वक्तव्य; काय आहे प्रकरण?
IPL च्या नवीन हंगामातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात RCB ने ६ गडी राखून विजय मिळवला आहे. सनरायझर्सच्या फलंदाजांनी या सामन्यात चमकदार कामगिरी करत २०१ धावांचा डोंगर उभा केला होता. RCB च्या फलंदाजांनी हे लक्ष्य अवघ्या १५.४ षटकांतच पूर्ण केले. याचसोबत सनरायझर्सच्या गोलंदाजांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या लाजीरवाण्या पराभवानंतर इशान किशनचे एक मोठे विधान समोर आले आहे.
च्यातो म्हणाला, “मला वाटते की सुरुवातीच्या ३-४ षटकांत गोलंदाजांनी चांगली साथ दिली.” पुढे तो म्हणाला की, “खरं सांगू तर मला यात खूप मजा आली. तुम्हाला माहीत आहे की मी प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. हे आयपीएल आहे, त्यामुळे कधीकधी धाकधूक (घबराहट) तर होतेच, पण एक संघ म्हणून आम्ही यात अधिक सुधारणा करत जाऊ. अशा परिस्थितीत जर आम्ही पुढचे सामने जिंकलो, तर आमच्यासाठी पुढे जाणे सोपे होईल.”
Comments are closed.