To protect Maharashtra including Mumbai thackeray brothers should come together, putting aside their differences says uddhav thackeray in marathi


भाजपा आणि फडणवीस यांचा कावा यात स्पष्ट दिसतो. लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे.

(Thackeray Vs Mahayuti) मुंबई : मराठी माणसाची भक्कम एकजूट पुन्हा एकदा फोडायची असेल तर संशय, संभ्रमाची भुताटकी उभी करण्याचा आटापिटा सुरू झाला आणि तसे झालेच. मुख्यमंत्री ‘देवेंदर फडणवीस’ आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट एका पंचतारांकित हॉटेलात झाली (अहो, झाली तर झाली!), पण लगेच भाजपामध्ये आणि ‘एसंशिं’ गटात उत्सव सुरू झाला. ‘‘मराठी जनांची एकजूट मोडली हो!’’ म्हणून हे लोक पेढे वाटू लागले. भाजपाचे मुखपत्र असलेल्या ‘तरुण भारत’चा मथळाच सांगतोय की, ‘आनंदी आनंद गडे, चर्चा थंडावली, राज-उद्धव युतीला विराम, फडणवीस-राज भेटीमुळे युतीच्या चर्चांना अचानक ब्रेक लागला आहे.’ विषाला उकळी फुटते ती अशी, अशी टिप्पणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (to protect Maharashtra including Mumbai thackeray brothers should come together, putting aside their differences says uddhav thackeray)

भाजपा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्राच्या राजधानीतून ‘मराठी’ माणूस कायमचा हद्दपार करायचाच आहे. हे आक्रमण थांबवायचे असेल तर मराठी ऐक्याची महागर्जना घुमवावी लागेल. त्यादृष्टीने एक ज्वलंत लोकभावना सध्या महाराष्ट्रात चर्चेला आली आहे. मुंबईसह महाराष्ट्राचे रक्षण करायचे असेल तर मतभेद गाडून ठाकरे बंधूंनी एकत्र यायला हवे या लोकभावनेची तीव्रता वाढली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी मराठी ऐक्याचा हात पुढे करताच महाराष्ट्राच्या सर्व बेइमानांचे धाबे दणाणले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा – Thackeray on Modi : यातून देशाला काय मिळाले? ठाकरेंचे मोदींवर शरसंधान

अशा पद्धतीने ‘मराठी एकजूट’ झाली तर महाराष्ट्राच्या राजकारणातून कायमचे तडीपार व्हावे लागेल या भीतीने अनेकांची गाळण उडाली. ‘एसंशिं’ (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गटापासून भाजपाच्या व्यापार मंडळापर्यंत प्रत्येक जण देव पाण्यात घालून बसला आहे, असे त्यांनी नमूद केले.

भाजपा आणि फडणवीस यांचा कावा यात स्पष्ट दिसतो. लोकांत संभ्रम, संशय निर्माण करणे, मराठी माणसांच्या एकजुटीला ‘ब्रेक’ लागल्याचा आनंद साजरा करणे हाच राज्यातील सत्ताधाऱ्यांचा हेतू आहे. मात्र या सर्व कावेबाज कारस्थानी लोकांच्या छाताडावर पाय रोवून शिवसेना 59 वर्षे ठामपणे उभी आहे, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातील अग्रलेखात म्हटले आहे.



Source link

Comments are closed.