Two days after the bridge accident in Kundmala, Ajit Pawar went on an inspection tour and got angry when he was asked questions
दोन दिवसांपूर्वीच कुंडमळा हा पूल कोसळून 4 जणांना आपले प्राण गमवावे लागेल. या दुर्घटनेनंतर अजित पवार आज (17 जून) पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना उशीरा येण्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारावरच भडकल्याचे पाहायला मिळाले.
पुणे : स्व. खासदार अण्णा जोशी यांच्या खासदार निधीतून सुमारे दहा लाख रूपये खर्चून 35 वर्षांपूर्वी कुंडमळा (इंदोरी) हा पूल बांधण्यात आला होता. पंचक्रोशीतील गावातील नागरिकांना पायी ये-जा करण्यासाठी बांधलेल्या या लोखंडी पुलावरून दुचाकी ने-आण करण्यासाठीही वापर केला जात होता. त्यामुळे कुंडमळा येथे नवा पूल उभारण्यात यावा, अशी ग्रामस्थ आणि स्थानिकांची मागणी होती. मात्र दोन दिवसांपूर्वीच हा पूल कोसळून दुर्घटना घडली आणि 4 जणांना आपले प्राण गमवावे लागेल. या दुर्घटनेनंतर अजित पवार आज (17 जून) पाहणी दौऱ्यासाठी गेले होते. त्यामुळे त्यांना उशीरा येण्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार पत्रकारावरच भडकल्याचे पाहायला मिळाले. (Two days after the bridge accident in Kundmala, Ajit Pawar went on an inspection tour and got angry when he was asked questions)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळल्याच्या दुर्घटनेतील जखमी नागरिकांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्यानंतर त्यांनी मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील पूल कोसळलेल्या घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. मात्र अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्रीही आहेत. त्यामुळे पूल दुर्घटनेच्या दोन दिवसांनी अजित पवार पाहणी दौऱ्यावर असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे. याचपार्श्वभूमीवर पत्रकारांनी अजित पवारांना प्रश्न विचारला, मात्र अजित पवार भडकले.
हेही वाचा – Sudhakar Badgujar : ज्या पक्षाने कारवाई केली त्यांना सांगू इच्छितो…; बडगुजर यांचा ठाकरे गटाला इशारा
पत्रकारांनी अजित पवारांना विचारले की, तुम्ही माळेगावच्या बैठकांमध्ये व्यस्त होता का? इकडे यायला इतका उशीर का झाला? पत्रकारांच्या या प्रश्नांवर अजित पवार भडकून म्हणाले की, हा विषय इथे घेऊ नका. यामुळेच मी तुमच्याशी बोलत नाही. मी इथे पाहणी करायला आलो आहे. मी माझं काम करत होतो. त्यामुळे पूल दुर्घटनेनंतर ताबडतोब मीकलेक्टरला सांगितलं की, मृत पावलेल्या व्यक्तींच्या वारसाला ताबडतोब मदत जाहीर करा आणि जखमींचा पूर्ण खर्च राज्य सरकारकडून करा. आम्ही आमचं काम करत असतो. मात्र कधी कधी काही जण टीआरपी वाढवण्याकरता आमच्या तोंडी काहीही शब्द टाकतात, असे म्हणत अजित पवार यांनी धीरूभाई अंबानींसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं.
गलथान कारभार चाललाय
अजित पवार म्हणाले की, पेट्रोल सोडतो म्हटलं की, पेट्रोल चोरतो म्हणून शब्द टाकतात. इतका गलथान कारभार चाललेला आहे. म्हणून मी जाहीर केलं की, ‘च’ हा शब्द माझ्या तोंडातून निघाला असेल तर मी राजकारण सोडून देईन. मग आता ज्यांनी बातमी दाखवली त्यांनी आपण चुकीची बातमी दाखवली म्हणून हे क्षेत्र सोडून द्यावं, अशी मागणी करत अजित पवार पत्रकारांवरच भडकले.
हेही वाचा – Ashok Chavan : जयश्री पाटील भाजपाच्या वाटेवर; नात्यागोत्यांचा पक्ष म्हणत चव्हाणांची काँग्रेसवर टीका
Comments are closed.