इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियामध्ये 2 मोठे बदल! BCCI ने केली मोठी घोषणा
इंग्लंड अंडर-19 संघाविरुद्धच्या मालिकेपूर्वी बीसीसीआयने भारत अंडर-19 संघात दोन मोठे बदल केले आहेत. भारतीय संघातील दोन खेळाडू, आदित्य राणा आणि खलन पटेल, दुखापतींमुळे इंग्लंड दौऱ्यातून बाहेर पडले आहेत. बीसीसीआयने त्यांच्या जागी डी दीपेश आणि नमन पुष्पक यांना संघात समाविष्ट केले आहे. या दौऱ्यासाठी दीपेश आणि नमन यांना स्टँडबाय यादीत समाविष्ट करण्यात आले आहे.
बीसीसीआयने म्हटले आहे की, “ज्युनियर क्रिकेट समितीने आदित्य राणा आणि खिलन पटेल यांच्या जागी इंग्लंड दौऱ्यासाठी डी दीपेश आणि नमन पुष्पक यांची निवड केली आहे.”
भारतीय अंडर-19 संघाचा इंग्लंड दौरा 24 जूनपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ (24 जून रोजी) 50 षटकांचा सराव सामना खेळेल. त्यानंतर 27 जूनपासून इंग्लंड अंडर-19 विरुद्धची एकदिवसीय मालिका सुरू होईल. भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध 5 एकदिवसीय सामने खेळायचे आहेत. पहिला सामना 27 जून रोजी खेळला जाईल. दुसरा सामना 30 जून रोजी खेळला जाईल. तर तिसरा सामना 2 जुलै रोजी होईल. एकदिवसीय मालिकेचा चौथा सामना 5 जुलै रोजी खेळला जाईल. मालिकेचा शेवटचा सामना (7 जुलै) रोजी होईल. आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणारे वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे या दौऱ्यात खेळताना दिसतील. आयुष या दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व करेल.
दोन्ही संघांमध्ये दोन बहु-दिवसीय सामन्यांची मालिका होईल. या मालिकेतील पहिला सामना 12 ते 15 जुलै दरम्यान खेळला जाईल. दुसरा आणि शेवटचा सामना 20 ते 23 जुलै दरम्यान खेळला जाईल.
Comments are closed.