Uddhav Thackeray on Raj Thackeray alliance for Mumbai Elections


मुंबई : गेल्या काही काळापासून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? याबाबत अनेक चर्चा सुरु आहेत. यावर पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीवर सकारात्मक भाष्य केले आहे. “कार्यकर्त्यांच्या मनात आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करणारा आहे. पण मराठी माणसांनी एकत्र येऊ नये यासाठी शेटजींचे नोकर फिरत आहेत. हॉटेलमध्ये जाऊन भेटीगाठी घेत आहेत. आमच्यात युती (उद्धव राज) पण होणार नाही होणार असे म्हणत आहेत. पण आमचे आम्ही बघू तुम्हाला काय करायचे आहे? आम्ही जनतेच्या मनात आहे तेच करणार आहोत,” असे म्हणत त्यांनी राज ठाकरेंसोबतच्या युतीसाठी आपले दरवाजे खुले ठेवले आहेत. (Uddhav Thackeray on Raj Thackeray alliance for Mumbai Elections)

हेही वाचा : Uddhav Thackeray : राजकारणात पोरं नसलेले…; वर्धापन दिनानिमित्त उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल 

हिंदी भाषेच्या सक्तीवरून आव्हान

राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा शिकवण्यात येणार आहे, यावरून राज्यात चांगलंच वातावरण तापलं आहे. हिंदी भाषेच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला. “या देशाची या लोकांनी वाट लावली. आता शिवसेना संपवण्याची वाट पाहत आहेत. अरे तुम्ही कितीही स्वप्न पाहा शिवसेना तुमच्या भ्रष्टाचाराला संपवून तुमच्या छाताडावर नाही भगवा रोवला तर नाव नाही सांगणार.” असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी केले. ” फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला भांडून चालणार नाही. भाजपची जी नीती आहे, त्यांनी विधानसभेत नारा दिला होता. बटेंगे ते कटेंगे. आपल्याला वाटलं हिंदू मुसलमान. आता मुंबईत हिंदू हिंदूत मारामाऱ्या लावायच्या. हिंदी सक्तीची करायची. हिंदी सक्तीची झाली की 93 ला ज्या लोकांना वाचवले होते. त्यांनाच आपल्यापासून तोडायचे.” असे ते म्हणाले.

“हिंदी सक्ती तर होऊ देणारच नाही. करायची असेल हिंमत तर देवेंद्र तुम्ही करून दाखवाच . हिंदीबद्दल आमचे वैर नाही, पण सक्ती कशासाठी? हिंदी सक्तीची करायची असेल तर तामिळनाडूमध्ये जाऊन पाहा, काय करतात ते. हिंदीची सक्ती गुजरातमध्ये केली नाही. आधी गुजरातमध्ये हिंदी सक्तीची करा. इथे आपल्याला भांडत ठेवायचे, निवडणुकीच्या तोंडावर आपण एकत्र राहतो. मराठी अमराठीत भांडण लावायची, मग हे भष्ट्राचार करायला मोकळे,” असा घणाघात यावेळी उद्धव ठाकरे यांनी केला.



Source link

Comments are closed.