Pandharpur Wari 2025 – भाविकांनी स्नान करण्यासाठी उतरू नये! चंद्रभागेची पाणीपातळी वाढली, आषाढी यात्रेपूर्वी पूर नियंत्रणासाठी प्रशासनाची धडपड

उजनी धरणातून 31,600 तर वीर धरणामधून 6,537 क्युसेक इतका विसर्ग भीमा नदीपात्रात सोडल्याने चंद्रभागा नदीला पूर आला आहे. नदी पात्रातील मंदिरे, जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे. भाविकांनी पुराच्या पाण्यात स्नान करण्यासाठी उतरू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

मागील काही दिवसांपासून निरा खोरे व भीमा खोर्‍यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. यामुळे नीरा नदीपात्रात वीर धरणामधुन 6537 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. भीमा नदीपात्रामध्ये उजनी धरणामधून 31600 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. तर नीरा व भीमा नदीच्या मुक्त पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे अनियंत्रित विसर्ग नदीपात्रामध्ये येत आहे. त्यामुळे सद्यस्थितीतील विसर्ग पाहता भीमा नदीपात्रामध्ये 40,000 क्युसेक्स पेक्षा जास्त विसर्ग प्रवाहित होणार आहे. त्यामुळे भीमा नदीवरील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भीमा नदीवरील बंधार्‍यांवरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात यावी, अशी सूचना जिल्हा प्रशासनाने केली आहे.

कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; पंचगंगा नदी पात्राबाहेर, मंदिरे बुडाली

आषाढी यात्रा एकादशीचा मुख्य सोहळा येत्या 6 जुलै रोजी साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी माउली व तुकोबाच्या पालख्यांसह मानाच्या पालख्या राज्यभरातून पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत. तर हजारो दिंड्यांचे देखील पंढरपूरकडे प्रस्थान झालेले आहे. त्यामुळे पंढरपूर येथे चंद्रभागेला पूरपरिस्थिती उदभवू नये. म्हणून जिल्हा प्रशासन प्रयत्न करत आहे. उजनी धरण 75 टक्के भरले आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस झाला तर पाणी साठवण क्षमता असावी म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. वारीपूर्वी बर्‍यापैकी धरणातील पाणी कमी करण्यात येणार आहे. तर वारी काळात पंढरपूर येथे चंद्रभागा नदीपात्रात केवळ दोन हजार क्युसेकचा विसर्ग सुरू ठेवण्यात येणार आहे.

Pandharpur News – पश्चिमद्वार ते चौफाळा एकेरी वाहतूक, चेंगराचेंगरी रोखण्यासाठी महत्वपूर्ण निर्णय

दरम्यान, मान्सूनपूर्व झालेल्या जोरदार पावसामुळे नीरा नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे भीमा नदीपात्रातील सर्व कोल्हापूर पद्धतीचे बंधारे मे महिन्याच्या अखेरीसच भरले गेले आहेत. आता यात उजनी धरणातून पाणी सोडण्यात आल्याने बंधारे त्वरीत भरून पाणी पुढे जात आहे. 30 हजार क्युसेक विसर्गाला दगडीपूल पाण्याखाली जातो. तर 35 हजार क्युसेकला कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पाण्याखाली जातात.

हे बंधारे पाण्याखाली

पटवर्धन कुरोली, गुरसाळे, इसबावी, पंढरपूर, गोपाळपूर, मेंढापूर, पोहोरगाव, पुळूज हे कोल्हापूर पध्दतीचे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर पंढरपूर येथील जुना दगडी पूल पाण्याखाली गेला आहे.

Comments are closed.