बायको घर सोडून माहेरी जाताना भांडीकुंडी सगळं घेऊन गेली, सामान परत आणायला नवरा टोळक्यासह लोखंडी

ठाणे गुन्हे: उल्हासनगरमध्ये कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळाला. लग्न झाल्यानंतर केवळ काही दिवसांतच वादामुळे पत्नी माहेरी गेली. जाताना घरातील भांडीकुंडी अन् सगळंच घेऊन गेली. सामान परत आणण्यासाठी नवरा थेट 10-12 जणांना घेऊन पत्नीच्या माहेरी पोहोचला.  संतप्त नवऱ्याने सासू, सासरे आणि पत्नीच्या भावावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी थेट प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात तिघे गंभीर जखमी झाले असून, संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Crime News)

नक्की काय घडले काय?

ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 मधील भरतनगर परिसरात घडली. समाधान बाविस्कर असं आरोपी जावयाचं नाव आहे. समाधानने 20 मे रोजी चिदानंद गावडे यांच्या मुलीशी लग्न केलं होतं. हे त्या मुलीचं दुसरं लग्न होतं. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच नवरा-बायकोमध्ये सतत वाद सुरू झाले. वाद विकोपाला गेल्यामुळे चिदानंद गावडे यांची मुलगी माहेरी परत आली. माहेरी येताना तिने तिच्या वैवाहिक आयुष्यातील खरेदी केलेल्या संसारोपयोगी वस्तू देखील सोबत आणल्या. यामुळे समाधान बाविस्कर नाराज झाला आणि त्याने त्या वस्तू मागण्यासाठी 10 ते 12 जणांसोबत गावडे कुटुंबाच्या घराकडे गेला.

वस्तू परत देण्यास नकार देण्यात आल्यानंतर संतप्त झालेल्या समाधानने त्याच्या साथीदारांसोबत रेखा गावडे (सासू), चिदानंद गावडे (सासरे) आणि करण गावडे (पत्नीचा भाऊ) यांच्यावर लोखंडी रॉड आणि लाठ्याकाठ्यांनी प्राणघातक हल्ला चढवला. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच विठ्ठलवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या आरोपी जावई समाधान आणि त्याच्यासोबत आलेल्या इतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

वाहतूक पोलिसाची कॉलर पकडली, डोक्यात दगड घालणार इतक्यात

“तू गाववाल्यावर हात उचलतोस, तुला बघून घेतो…” असे म्हणत रुणाने रागाच्या भरात पोलिसाला अश्लील शिवीगाळ केली, कॉलर पकडली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे परिसरात अर्धा तास गोंधळाचं वातावरण होतं. आता या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कल्याणच्या शहाड उड्डाण पुलाजवळ वाहतूक कोंडीदरम्यान एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस हवालदाराला एका तरुणाने शिवीगाळ करत मारहाण केल्याची घटना मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

हेही वाचा

https://www.youtube.com/watch?v=wfmripph5ze

आणखी वाचा

Comments are closed.