Union Budget 2025 Vijay Wadettiwar reaction news in Marathi


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (ता. 01 फेब्रुवारी) 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. परंतु. यंदाच्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्याने महाराष्ट्राबाबत काहीच घोषणा न केल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे.

नागपूर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज शनिवारी (ता. 01 फेब्रुवारी) 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला आहे. परंतु. यंदाच्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्याने महाराष्ट्राबाबत काहीच घोषणा न केल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारचा अर्थसंकल्प हा महाराष्ट्रावर अन्याय करणारा असून पुन्हा एकदा महाराष्ट्राला सापत्न वागणूक दिल्याचे आज स्पष्ट दिसले. हे बजेट भारताचे नसून येत्या काळात निवडणूक असणाऱ्या बिहार राज्याचे आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. या वर्षाच्या अखेरीस बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा होणार आहे, त्याचमुळे बिहारवर यंदाच्या अर्थसंकल्पातून विशेष प्रेम दाखवण्यात आल्याचे विरोधकांकडून सांगण्यात येत आहे. (Union Budget 2025 Vijay Wadettiwar reaction)

आज जाहीर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात बिहार राज्यासाठी विविध घोषणांचा वर्षाव करण्यात आला. तिथून सरकारला टेकू मिळत असल्याने आणि येणाऱ्या काळात निवडणूक असल्याने बिहारला झुकते माप मिळाले. पण यावर्षी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या पदरी निराशा आली आहे. महाराष्ट्र हे राज्य केंद्र सरकारला सगळ्यात जास्त कर देत असताना महाराष्ट्रावर वारंवार अन्याय करण्यात येत असल्याची भूमिका वडेट्टीवार यांनी मांडली. आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आठव्यांदा अर्थसंकल्प सादर केला. पण यातून शेतकरी, तरुण ,महिला, सामान्य नागरिकांचा भ्रमनिरास झाला आहे. भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यासाठी शेतमालाला हमीभाव मिळाला पाहिजे, त्यांची कर्जमाफी झाली पाहिजे, पण असा कोणताही दिलासा आज मिळाला नाही. शेतकऱ्यांना लागणारी खते, बी बियाणे, पीकविमा याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट आहे. तसेच आज देशात रोजगाराचा सगळ्यात मोठा प्रश्न असताना रोजगारासाठी, तरुणांना नवीन संधी उपलब्ध करून देण्याचे धोरण सरकारने मांडले नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.

हेही वाचा… Rahul Gandhi : मोदी सरकारच्या अर्थसंकल्पावर राहुल गांधींची तिखट प्रतिक्रिया; म्हणाले, बंदुकीची गोळी लागलेल्या जखमांवर…

महाराष्ट्रात मेट्रो, रेल्वेसाठी निधी दिला, असे सत्ताधारी सांगत असतील तर उर्वरित महाराष्ट्रासाठी कोणतीही ठोस तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आलेली नाही. मध्यमवर्गीय टॅक्समुळे त्रासले होते, केंद्र सरकारची लोकप्रियता घसरत चालली आहे. त्यासाठी टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे हे बनवाबनवीचे बजेट असल्याची भूमिका काँग्रेस ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी मांडली. मेक इन इंडियाची नुसती घोषणा झाली, पण त्यातून हाती काही लागले नाही. त्यामुळे नॅशनल मॅन्यूफॅक्चरींग हे नवीन मिशन आणले आहे, म्हणजे नवीन बाटलीत जुनेच औषध पुन्हा देण्यात येत आहे, अशी टीका ही वडेट्टीवार यांनी केली.



Source link

Comments are closed.