या बच्चनने स्वतः केलेला करिश्मा कपूरचा भावी ‘सून’ म्हणून उल्लेख, मग का तुटले अभिषेक- करिश्माचे लग्न – Tezzbuzz
करिश्मा कपूर एकेकाळी बच्चन कुटुंबाची सून हाेणार हाेती. इतकंच काय, तर जया बच्चन यांनी सगळ्यांच्या समाेर करिशमाला “आपली हाेणारी सून” असंही म्हटलं हाेतं. करिश्मा कपूरनं 2003 साल मध्ये उद्याेगपती संजय कपूरशी लग्न केलं हाेतं. दाेघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. पण साल 2014 मध्ये ते वेगळे झाले आणि साल 2016 मध्ये त्यांचा घटस्फाेट झाला.
आता अलीकडेच लंडनमध्ये संजय कपूर यांना हार्ट अॅटॅक आला आणि त्यांचे निधंन झालं. ते फक्त 53 वर्षाचे हाेते. पण संजयशी लग्न हाेणेयाअधीच करिश्मा कपूर अभिषेक बच्चनशी लग्न करणार हाेती. 2002 साल मध्ये दाेघांचं साखरपुढा झाला हाेता. पण काही महिन्यातच दाेघांचं नात तुटलं. नंतर 2007 साल मध्ये ऐश्वर्या रायशी लग्न केलं.
2002 साल मध्ये अमिताभ बच्चन यांच्या 60 व्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात त्यांच्या वरच एक खास पुस्तक लाॅन्च झालं हाेतं, ‘टू बी ऑर नॉट टू बी: अमिताभ बच्चन’. या कार्यक्रमातच जया बच्चन यांनी सगळ्यांसमाेर अभिषेक आणि करिश्मा कपूर यांच्या साखरपुढ्याची घाेषणा केली हाेती. आता त्या वेळचा एक व्हिडिओ साेशल मीडियावर खूपच व्हायरल हाेताेय. त्या मध्ये जया बच्चन करिश्माला “माझी हाेणारी सुन” असं प्रेमानं म्हणताना दिसतात.
त्या व्हिडिओत जया म्हणतात, “बच्चन कुटुंब आणि नंदा कुटुंबाच्या बरोबरच आता आमच्या ग्रुपमध्ये अजून एक कुटुंब जोडलं जातंय. ते म्हणजे कपूर कुटुंब. रणधीर आणि बबिता कपूर, आणि माझी होणारी सून करिश्मा कपूर. हे सगळं अभिषेककडून त्याच्या बाबांसाठी त्यांच्या 60व्या वाढदिवसासाठी एक गिफ्ट आहे.”
बच्चन यांची मुलगी श्वेता हिनं 1997 मध्ये निखिल नंदा याच्याशी लग्न केलं होतं. निखिल हा राज कपूर यांची मुलगी ऋतू नंदा आणि राजन नंदा यांचा मुलगा आहे. बच्चन आणि कपूर कुटुंबाकडून कधीच असं उघडपणे सांगितलं नाही की करिश्मा आणि अभिषेकचं नातं का तुटलं.
पण काही रिपोर्ट्समध्ये असं सांगितलं जातं की करिश्माची आई बबिता यामागचं कारण होती. बबितांना वाटत होतं की करिश्माच्या भविष्यासाठी काहीतरी आर्थिक सुरक्षा असायला हवी. त्यामुळे त्यांनी एक अट ठेवली होती, लग्नाच्या आधी अमिताभ बच्चन यांनी त्यांची थोडीशी प्रॉपर्टी अभिषेकच्या नावावर करावी, म्हणजे करिश्माचं भविष्य सेफ राहील.
हे म्हणणं चुकीचं नव्हतं, कारण त्या वेळी करिश्मा मोठी स्टार होती. तिचं करिअर 1991 मध्ये सुरू झालं होतं. पण अभिषेकने अजून नुकतंच 2000 मध्ये बॉलिवूडमध्ये काम करायला सुरुवात केली होती. पण बच्चन कुटुंबाने ती अट मान्य केली नाही. आणि म्हणूनच दोघांचं नातं तुटलं.
पॅपराझींना पाहून मौनी रॉयने लपवला तिचा चेहरा; अभिनेत्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
या कारणामुळे अक्षय कुमार वर्षाला करतो ४ सिनेमे; म्हणाला, अडचण काय आहे…
Comments are closed.