वसईत मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग; 25 झोपड्या जळून खाक, अनेक कुटुंबे उघड्यावर

Vasai Fire Accident: वसई पश्चिमेतील दत्तानी मॉल आयटी पार्कच्यामागे असलेल्या मजुरांच्या झोपडपट्टीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत सुमारे  25 झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने, होळी सणानिमित्त बहुतांश मजूर आपल्या गावी गेल्याने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीत मजुरांच्या झोपडीतील सर्व साहित्य जळून खाक झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. ही दुर्घटना काल (15 मार्च) रात्री आठच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महापालिकेच्या अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

होतं नव्हतं ते सारं जळालं, अनेक कुटुंबे उघड्यावर

या झोपडपट्टीत राहणारे बहुतांश मजूर पालघर जिल्ह्यातील गावपाड्यांचे रहिवासी आहेत. या आगीत त्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक कुटुंबे उघड्यावर पडली आहेत. त्यामुळे प्रशासनाने या झोपडीधारक मजुरांना तातडीने मदत व भरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून केली जात आहे.

भरधाव कारणे घेतला अचानक पेट

समृद्धी महामार्गावर पालखेड गोळवाडी शिवारात भरधाव कारणे अचानक पेट घेतला. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाहीये. या घटने बाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार छत्रपती संभाजीनगरला जात असलेल्या भरधाव कारला शनिवार सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पालखेड गोळवाडी शिवारात अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच गाडीतील प्रवासी हे तात्काळ खाली उतरले. यामुळे सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवित हानी झालेली नाहीये मात्र गाडी जळून खाक झाली आहे.

हे ही वाचा

अधिक पाहा..

Comments are closed.