कोहलीनं रणनीती बदलली, विरोधी संघांची झोप उडाली, पाक,ऑस्ट्रेलियानंतर न्यूझीलंडला दणका बसणार

नवी दिल्ली : भारताचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीनं पुन्हा फॉर्ममध्ये परतला आहे. विराट कोहली म्हटलं की आक्रमक खेळाडू, विरोधी संघाच्या खेळाडूंना आक्रमकपणानं उत्तर देणारा खेळाडू अशी ओळख विराटची होती. विराट कोहलीनं यापूर्वी विरोधी संघांच्या खेळाडूंना आव्हान दिल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, विराट कोहलीनं रणनीती बदलली असून त्याचा परिणाम त्याच्या कामगिरीवर देखील दिसून आला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील दोन प्रमुख सामन्यांमध्ये म्हणजेच पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध  विराट कोहलीनं चौकार आणि षटकार मारण्याऐवजी एक- एक  धाव घेत धावफलक बदलता ठेवण्याची भूमिका घेतली. विराटच्या याच रणनीतीनं ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानची झोप उडाली. आता न्यूझीलंडला देखील याचा फटका बसू शकतो.

विराट कोहलीसाठी गेले काही महिने आव्हानात्मक होते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत विराटला चांगली कामगिरी करता आली नव्हती. 2024 मध्ये खेळलेल्या 6 एकदिवसीय सामन्यांमध्ये विराट कोहली सहा पैकी पाच सामन्यांमध्ये लेग स्पिनरच्या गोलंदाजीवर बाद झाला होता. त्यामुळं विराटवर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराट कोहलीनं आपल्या फलंदाजीची रणनीती बदलल्याचं पाहायला मिळालं. पाकिस्तान विरुद्धच्या मॅचमध्ये विराटनं नाबाद शतक केलं होतं. विराट कोहलीनं त्या डावात केवळ चौकार मारले होते. त्याचीच पुनरावृत्ती ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मॅचमध्ये पाहायला मिळाली.

विराटनं  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीत 98  बॉलमध्ये 84 धावांची खेळी केली. या डावात विराट कोहलीनं  56  सिंगल्स काढल्या. यामुळं स्ट्राइक रोटेट होत राहिली. धावफलक बदलता राहिला यामुळं भारतीय संघावर अधिक दबाव आला नाही.ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराटनं केवळ 5 चौकार मारले,56 सिंगल्स काढल्या तर, चार वेळा 2-2 रन धावून काढल्या.

विराट कोहली म्हणाला ही खेळी पाकिस्तान विरुद्धच्या खेळी सारखीच होती. इथं परिस्थिती समजून घेणं आणि स्ट्राइक रोटेट करणं गरजेचं होतं ,कारण या खेळपट्टी भागिदारी महत्त्वाची होती, असं विराट कोहली म्हणाला.

विराट कोहलीच्या आक्रमक खेळी ऐवजी संयमी खेळीनं विरोधी संघांची झोप उडाल्याचं दिसून आलं. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाला पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू एश्टन एगरनं म्हटलं की त्याच्या चांगल्या फटक्यामुळं दबाव बनवणं अशक्य आहे. विराट कोहली लयीत असतो त्यावेळी आपण त्यावर दबाव निर्माण करु शकत नाही. त्यामुळं त्याला बाद करणं आवघड होतं.

दरम्यान, विराट कोहलीच्या बदललेल्या रणनीतीचा फटका न्यूझीलंडला देखील अंतिम फेरीच्या लढतीत बसू शकतो. विराट कोहली 2000 नंतर सर्वाधिक सिंगल्स धावा करणारा खेळाडू ठरला आहे. त्याच्या नावावर 5868 धावा आहेत.

इतर बातम्या :

अधिक पाहा..

Comments are closed.