कोण आहे मानव सुथार? अफगाणिस्तानविरुद्ध कसोटीत केलं पदार्पण; शुभमन गिलशी खास नातं, एकाच सामन्यात

मानव सुथारने भारताकडून अफगाणिस्तानविरुद्ध मुल्लानपूर येथे कसोटी पदार्पण केले : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील एकमेव कसोटी सामना चंदिगढ येथील मुल्लानपूर स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या ऐतिहासिक सामन्यात भारताकडून युवा फिरकीपटू मानव सुथार (Manav Suthar) याला कसोटी पदार्पणाची (Debut) संधी मिळाली आहे. मानव सुथार भारताकडून कसोटी कॅप मिळवणारा 319 वा खेळाडू ठरला आहे. ज्याने आपल्या फिरकीच्या जोरावर देशांतर्गत क्रिकेट गाजवले आहे.

कोण आहे मानव सुथार? (Who is Manav Suthar?)

मानव सुथार हा प्रामुख्याने डाव्या हाताचा ऑर्थोडॉक्स स्पिनर (Left-arm orthodox spinner) आणि खालच्या फळीतील उपयुक्त फलंदाज आहे. मानवचा जन्म 3 ऑगस्ट 2002 रोजी राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे झाला. तो देशांतर्गत क्रिकेटमध्ये राजस्थानचे प्रतिनिधित्व करतो. याशिवाय तो इंडिया अंडर-19 संघाचाही भाग राहिला आहे.

कर्णधार शुभमन गिलशी काय आहे खास नातं? (Manav Suthar Test debut for India)

मानव सुथारचा भारतीय संघाचा सध्याचा कर्णधार शुभमन गिल याच्याशी एक खास संबंध आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये मानव सुथार हा गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाकडून खेळतो, ज्या संघाचा कर्णधार शुभमन गिल आहे. आयपीएलनंतर आता शुभमन गिलच्याच नेतृत्वाखाली मानवने भारतीय कसोटी संघातही आपले पदार्पण केले आहे.

एकाच सामन्यात 11 विकेट्स घेण्याचा पराक्रम

मानव सुथारने देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच प्रभावित केले आहे. रणजी ट्रॉफीमध्ये छत्तीसगडविरुद्ध खेळताना त्याने आपल्या फिरकीची जादू दाखवली होती. त्याने छत्तीसगडविरुद्धच्या सामन्यात एकाच डावात 8 गडी बाद केले. राजस्थानकडून रणजी ट्रॉफीच्या एका डावात 8 किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो 8 वा गोलंदाज ठरला. विशेष म्हणजे, मानवने त्या संपूर्ण सामन्यात एकूण 11 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. त्याच्या या अष्टपैलू कामगिरीमुळे राजस्थानने छत्तीसगडवर विजय मिळवला होता आणि छत्तीसगडसाठी हा फिरकीपटू हिरो ठरला होता.

मानव सुथारची आतापर्यंतची कामगिरी

मानवने अतिशय कमी वेळात देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये (First-Class) त्याने 29 प्रथम श्रेणी सामन्यांत 129 बळी घेतले आहे. तसेच रणजी करंडक2022-23 च्या हंगामात राजस्थानसाठी अवघ्या 6 सामन्यांत 39 बळी घेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता.

हे ही वाचा –

R Praggnanandhaa : बुद्धीबळाच्या जगाचा नवा सुलतान! आर. प्रज्ञानंदने रचला इतिहास; पाच वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनला एकाच स्पर्धेत दोनदा लोळवलं, नॉर्वे चेस जिंकणारा पहिला भारतीय

Comments are closed.