IND vs ENG: पाचव्या दिवशी कोणता संघ जिंकेल? मायकेल वॉनची मोठी भविष्यवाणी!

लीड्स कसोटी सामन्यात भारताने इंग्लंड संघाला 371 धावांचं आव्हान दिलेलं आहे (Test Series IND vs ENG). चौथ्या दिवसाच्या शेवटी इंग्लंडने कोणत्याही नुकसानाविना 21 धावा केलेल्या आहेत. आता पाचव्या दिवशी इंग्लंडला जिंकण्यासाठी 350 धावांची गरज आहे, तसेच भारताला 10 विकेट्सची आवश्यकता आहे. अशामध्ये पाचवा दिवस कसोटी सामन्यातील सर्वात रोमांचक दिवस ठरू शकतो. काही माजी दिग्गजांनी भारतीय संघाला जिंकण्याचा प्रबळ दावेदार ठरवले आहे. पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने शेवटच्या दिवसाविषयी भविष्यवाणी केली आहे. (michael Vaughan Prediction on Day 5 IND vs ENG series)

मायकल वॉनने कसोटी सामन्यात कोणती टीम जिंकेल याविषयी त्यांची भविष्यवाणी केलेली आहे. त्यांनी आश्चर्यचकित होऊन कसोटी सामन्याला ड्रॉ घोषित केले आहे. पण हे तेव्हाच निर्भर करेल? जेव्हा सुरुवातीसत्रात बुमराह कशा पद्धतीने खेळतो आणि दुपारी जडेजा कसा खेळतो. ते म्हणाले मला वाटते की, हे ड्रॉ होऊ शकते. जे माझ्यासाठी असामान्य आहे. मी एका संघाकडून विजय किंवा पराभूत होण्याची आशा करतो. पण मला वाटते की, हा कसोटी सामना ड्रॉ होऊ शकतो.

भारताने दुसऱ्या डावामध्ये 365 धावा केल्या होत्या. भारतासाठी केएल राहुलने (KL Rahul) 137 धावा तसेच रिषभ पंतने (Rishbh Pant)118 धावांची पारी खेळली. दोघांनी मिळून 195 धावांची भागीदारी केली, ज्याच्या मुळे भारतीय संघ 365 धावा करण्यात यशस्वी ठरला. भारताने पहिल्या डावात 6 धावांची आघाडी घेतली होती, ज्या कारणाने इंग्लंडला 371 धावांचं आव्हान मिळालेलं आहे.

जर इंग्लंडने 372 धावांचा यशस्वीपणे पाठलाग केला, तर हा कसोटी इतिहासातील त्यांचा दुसरा यशस्वी पाठलाग असेल. कसोटी इतिहासात इंग्लंडने सर्वात मोठा रन चेज 2022 मध्ये केला होता, जेव्हा भारताविरुद्ध कसोटीमध्ये इंग्लंडने 378 धावा करून सामना जिंकला होता. तसेच कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात मोठी रन चेज करण्याचा रेकॉर्ड वेस्टइंडीजच्या नावावर आहे, वेस्ट इंडिजने 2003 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 418 धावांचा पाठलाग करताना सामना जिंकून इतिहास रचला होता.

Comments are closed.