IND vs ENG: टीम इंडियाला लीड्समध्ये विजयासाठी कराव्या लागतील एवढ्या धावा, जाणून घ्या संपूर्ण समीकरण!
भारत विरुद्ध इंग्लंड (Test Series IND vs ENG) मालिकेतील पहिला कसोटी सामना रोमांचक मोडवर आहे. तिसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने एकूण 96 धावांनी आघाडी घेतली होती. पहिल्या डावात टीम इंडियाने (Team india) 471 धावा केल्या होत्या आणि इंग्लंडने 465 धावा केल्यावर टीम इंडियाला अवघ्या 6 धावांची आघाडी मिळाली होती. इंग्लंड चौथ्या डावामध्ये आव्हान पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल, पण टीम इंडियाला लक्षात ठेवावे लागेल की फलंदाजीसाठी चांगलं मानलं जाणाऱ्या हेंडिंग्ले मैदानावर किती धावसंख्या केल्यावर तेवढी धावसंख्या इंग्लंडला करण्यापासून ते वाचवू शकतात?
लीड्समध्ये तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 465 धावांवर ऑल आउट केले. 6 धावांनी आघाडी घेतल्यानंतर दुसऱ्या डावामधे टीम इंडियाने तिसऱ्या दिवशी 2 विकेट गमावून 90 धावा केल्या होत्या. जाणून घ्या की, आकड्यांच्या आधारावर टीम इंडिया लीड्समध्ये किती धावसंख्येचे टार्गेट डिफेंड करू शकते.
हेडिंग्ले क्रिकेट ग्राउंडच्या इतिहासावर नजर टाकायची झाल्यास, दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारा संघ 34 वेळा जिंकला आहे, तसेच पहिल्यांदा फलंदाजी करणारा म्हणजेच टार्गेट देणारा संघ 29 वेळा जिंकला आहे. क्रिकेट मैदानावर आत्तापर्यंत कसोटी इतिहासात सर्वात मोठी धावसंख्या 404 धावा आहे. जी ऑस्ट्रेलियाने 1948 मध्ये इंग्लंड विरुद्ध केली होती.
1948 नंतर या मैदानावर कधीही 400 पेक्षा अधिक धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकलेला नाही. 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाने इंग्लंड विरुद्ध 359 धावांचं आव्हान पूर्ण केलं होतं, तसेच 1948 नंतर लीड्समध्ये कोणत्याही विदेशी संघाने धावांचा पाठलाग केलेली धावसंख्या 322 आहे, जी वेस्ट इंडिजने 2017 मध्ये इंग्लंड विरुद्ध जिंकली होती. हे आकडे सांगतात की, टीम इंडियाने जर इंग्लंड समोर 400 किंवा त्यापेक्षा जास्त धावांचं आव्हान ठेवलं, तर कुठे ना कुठे टीम इंडियाचा विजय निश्चित होऊ शकतो.
Comments are closed.