वात आला, हाताची बोटेही आखडली, तरीही पठ्ठ्याने हार नाही मानली; इंग्लंडमध्ये यशस्वीने ठोकले विक्र

यशसवी जयस्वाल सेंचुरी इंग्लंड विरुद्ध इंडिया प्रथम कसोटी: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना 20 जूनपासून लीड्समध्ये सुरू झाला आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजीस आमंत्रित केलं. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नव्या युगाची सुरुवात करत मैदानात उतरला. सामन्याच्या पहिल्या दिवशी सगळ्यांचं लक्ष यशस्वी जैस्वाल होते, ज्याने आज इंग्लंडच्या मातीत नवा इतिहास लिहिला.

वात आला, हाताची बोटेही आखडली, तरी….

इंग्लंडमझील वातावरण थंड आहे, त्यामुळे खेळाडूंच्या हाताला वात येत आहे. या खेळी दरम्यान, यशस्वी जैस्वालची पण बोटंही आखडलेली, तरीही त्याने न थांबता खेळ चालू ठेवला. त्याच्या फलंदाजीतील संयम आणि स्ट्रोक्स बघून मैदानावर उपस्थित प्रेक्षक आणि टीव्हीसमोरचं जग थक्क झालं. यशस्वीने केवळ शतकच झळकावलं नाही, तर इंग्लंडच्या कसोटी इतिहासात पदार्पणाच्याच सामन्यात शतक करणाऱ्या मोजक्या परदेशी खेळाडूंमध्ये आपलं नाव कोरलं. त्याने 144 चेंडूत हे शतक पूर्ण केलं, आणि त्याच्या या खेळीने भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली.

पहिल्या डावात शतक झळकावणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज

यशस्वी जैस्वालने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले आहे.  कसोटी कारकिर्दीतील त्याचे पाचवे शतक आहे. या शतकासह, तो इंग्लंडच्या भूमीवर त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा फक्त पाचवा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याच्या आधी सौरव गांगुलीसह 5 भारतीय फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

इंग्लंडमध्ये खेळताना त्याच्या पहिल्या डावात शतक झळकावणारा पहिला भारतीय विजय मांजरेकर होता, ज्याने 1952 मध्ये 133 धावा केल्या होत्या. त्याच्यानंतर संदीप पाटील, सौरव गांगुली आणि मुरली विजय यांनी अशी कामगिरी केली आहे. जैस्वालने यापूर्वीही त्याच्या पदार्पणाच्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा खेळाडू बनला होता. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीच्या पहिल्या डावात वेस्ट इंडिजविरुद्ध 171 धावांची शानदार खेळी केली.

हे ही वाचा –

WTC विजेत्या संघात मोठा ट्वीस्ट! आगामी कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार बदलला, टेम्बा बावुमा बाहेर

आणखी वाचा

Comments are closed.