आळंदीत कत्तलखाना होणार की नाही? मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं; म्हणाले, ‘मी आदेश…’

देवेंद्र फड्नाविस: पिंपरी-चिंचवडच्या हद्दीतील आळंदी (Alandi) शहराजवळ विकास आराखड्यात कत्तलखाण्यासाठी आरक्षण ठेवण्यात आले आहे. आळंदीसारख्या पवित्र देवस्थानाजवळ अशा प्रकारचे आरक्षण करण्यात आल्यामुळे विविध स्तरांतून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही

पुणे येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, जो काही विकास आराखडा आहे त्या विकास आराखड्यामध्ये आळंदीमध्ये एक आरक्षण कत्तलखाण्याकरिता दाखवण्यात आले आहे. कुठल्याही परिस्थितीत आळंदीत कट्टरखाना करता येणार नाही. त्यामुळे ते आरक्षण वगळण्याचे आदेश मी स्वतः दिले आहेत. मी आमच्या संपूर्ण वारकरी संप्रदायाला आश्वासन देतो की, कोणत्याही परिस्थितीत आळंदीत अशा प्रकारचा कत्तलखाना करू दिला जाणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

पावसाच्या परिस्थितीवर सरकारचं लक्ष

पावसामुळे राज्यातील धरण साठ्यांमध्ये वाढ झाली आहे. विविध धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याबाबत विचारले असता, देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्ही पूर्ण परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहे. कधी विसर्ग सुरू करायचा, कधी बंद करायचा, या संदर्भात सर्व नियोजन करण्यात आले आहे. बाजूच्या राज्यांशी आपण समन्वय साधत आहोत. संबंधित राज्यात आपला एक इंजिनियर बसलेला आहे. जो संपूर्ण पावसाळ्यात तिथेच असतो आणि त्या राज्यांशी समन्वय साधण्याचे काम करतो. त्यामुळे आपण योग्य प्रकारचा समन्वय साधत आहोत. अर्थात निसर्गाचा अलीकडच्या काळात फार भरोसा देता येत नाही. पण, आपल्याकडून नियोजन करण्यात आलेले आहे, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.

पुणे विद्यापीठाचे अभिनंदन

पुणे विद्यापीठाचा आंतरराष्ट्रीय दर्जा वाढला आहे. याबाबत विचारले असता देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी पुणे विद्यापीठाचे अभिनंदन करतो. जगातल्या पहिल्या 600 विद्यापीठांमध्ये आता पुणे विद्यापीठ आले आहे. मला अपेक्षा आहे की, पुढच्या वर्षी किंवा येत्या दोन वर्षात आपलं जे स्वप्न होतं की, पहिल्या पाचशे विद्यापीठात आपली विद्यापीठं असावीत. कारण जगामध्ये पहिल्या पाचशे विद्यापीठांना मान असतो. त्या दिशेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे येथील कुलगुरू, व्यवस्थापन परिषद आणि प्राध्यापकांचा देखील अभिनंदन, असे त्यांनी म्हटले. तर पुढील काही दिवसांमध्ये विद्यापीठांमध्ये रिक्त असलेल्या जागा भरण्यात येणार असल्याची माहिती देखील देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=z4G6ie_dqty

आणखी वाचा

Sanjay Raut: बोलबच्चन प्रेरणा आम्ही मोदींकडून घेतली, ते समस्त जगातील बोलबच्चन महामंडळाचे अध्यक्ष आहेत; संजय राऊतांचा फडणवीसांच्या वक्तव्यावर पलटवार

आणखी वाचा

Comments are closed.