पाच वर्ष संपत आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का? अनिल देशमुखांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

अनिल देशमुख नागपूर : पावसाची सुरुवात होऊन खरीप पेरण्यांना सुरुवात झाली असताना राज्यात अनेक ठिकाणी रासायनिक खतांचा तुटवडा जाणवत आहे. युरिया, डीएपी आणि मिश्र खतांचा विदर्भात 20 ते 30% तुटवडा आहे. राज्य शासनाने लवकरात लवकर पुरवठा वाढवावा, अन्यथा काळा बाजार होण्याची वेळ येईल. शेतकरी अडचणीत असताना खतांच्या किमतीत वाढ होत आहे. किमतीच्या वाढीवर सरकारने नियंत्रण ठेवावे. सुरुवातीला नियोजन करायला हवं होतं. मात्र कृषी विभाग आणि राज्य सरकारने ते नियोजन केलेलं नाही, म्हणून अडचण निर्माण झालीय. सोबतच कर्जमाफीची योग्य वेळ नेमकी कोणती? आज लागवडीसाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाही, त्यामुळे हीच तर योग्य वेळ आहे. अन्यथा पाच वर्षाच्या अखेरच्या महिन्यात कर्जमाफी करणार का? असा संतप्त सवाल करत राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी सरकारला जाब विचारला आहे.

शरद पवार यांची साथ ज्यांनी ज्यांनी सोडली, ते जेव्हा एकांतात भेटतात, तेव्हा….

शरद पवार यांची साथ ज्यांनी ज्यांनी सोडली, ते जेव्हा आम्हाला एकांतात भेटतात, तेव्हा ते सांगतात की विशिष्ट परिस्थितीत आम्हाला शरद पवार यांची साथ सोडायला लावण्यात आली. नाही तर आम्ही शरद पवार यांची साथ सोडली नसती. भास्कर जाधव आमच्या पक्षातील प्रदेशअध्यक्ष होते. ते आज शरद पवार यांची साथ सोडायला नको होती असे म्हणतात, इतर अनेक वरिष्ठ नेते ही असेच म्हणतात. असेही अनिल देशमुख म्हणाले. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी राजकीय संन्यासाचे संकेत दिले असून, “आठ वेळा निवडणूक जिंकल्यानंतर आता थांबायचा विचार करावा, असं वाटतं,” असे त्यांनी म्हटले आहे. याच मुद्दयावर अनिल देशमुख यांनी भाष्य करत प्रतिक्रिया दिली आहे.

शेतकऱ्यांच्या नेमकं किती आत्महत्या झाल्यावर कर्जमाफीची करता?- संजय राऊत

देवेंद्र फडणवीस यांची योग्य वेळ ही नक्की कधी येणार? विधानसभा निवडणुकांच्या आधी आपल्या जाहीरनाम्यात आपण वचन दिलेलं  आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल आणि लाडक्या बहिणींना 2100 दिले जातील, असे म्हटलं आहे. लाडक्या बहिणीने त्यांचे पैसे दिले नाहीत. आहे ते सुद्धा कमी केले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात आपण जाहीर भाषणे सुद्धा केली आणि आता अर्थमंत्री अजित पवार म्हणतात , अशा प्रकारचा कोणतेही वचन अथवा आश्वासन दिले नाही.  कर्जमाफीची घोषणा कधी करणार आहेत? शेतकऱ्यांच्या दहा हजार आत्महत्या झाल्यावर का एक लाख आत्महत्या पूर्ण झाल्यावर? असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

हे ही वाचा

आणखी वाचा

Comments are closed.