नाशकात खड्ड्यांनी सेवानिवृत्त शिक्षकाचा जीव घेतला, पोलिसांनी मृत शिक्षकालाच ठरवले जबाबदार ! कुट


नाशिक: नाशिक शहरात रस्त्यांमुळे अनेकांचे अपघाती मृत्यू झाले आहेत. मात्र खड्ड्यामुळे एका सेवानिवृत्त शिक्षकाचा गेल्या महिन्यात पंचवटीत अपघात झाला होता. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी या कुटुंबाकडून केली जात होती. मात्र, पोलिसांनी अपघाताचा तपास करून स्वतः पोलीस फिर्यादी होऊन अपघातात मृत्यू झालेल्या मधुकर झेटे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

खड्ड्यात गाडी गेल्याने अपघात

नाशिक महानगरपालिकेच्या दुर्लक्षपणामुळे नाशिक शहरात गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय रस्त्यांमुळे अनेक छोट्या-मोठ्या अपघातांच्या घटना घडत आहेत. मात्र मागील महिन्यात पंचवटीतील गुंजाळ मळा या ठिकाणी सेवानिवृत्त शिक्षक मधुकर झेटे यांचा खड्ड्यात गाडी जाऊन अपघात झाला. या अपघातात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मात्र या अपघातानंतर पोलिसांनी मधुकर झेंडे यांच्यावरच गुन्हा दाखल केला आहे. गाडी वेगाने चालवणे, हेल्मेट न वापरणे आणि बेधडकपणे गाडी चालवण्याचा अहवाल पोलिसांच्या चौकशीनंतर समोर आलाय. मात्र, या गुन्ह्यानंतर झेटे कुटुंबाकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करत आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली जात आहे तर पोलिसांकडून सखोल चौकशी करून आणि पंचांसमक्ष नमूद झालेल्या तपासानंतर गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आले आहे.

नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे अनेक नाशिककरांचे अपघात होत आहे तर अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र ज्यांचे अपघात झाले त्यांच्यावरच पोलिसांकडून गुन्हे दाखल केले जात असताना रस्त्यांमध्ये खड्डे का पडले आणि संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या विरोधात नेमकी काय कारवाई केली जाईल असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होत आहे.

या घटनेवर पोलीस अधिकारी म्हणाले, १४तारखेला १ वाजता हि खबर मिळाली होती कि  दिनकर जेधे स्कुटीवरून गुंजाळ माळ्याच्या दिशेने जात असताना खड्यात गाडी जाऊन ते पडले. त्यांच्या कानातून नाकातून रक्त वाहिलं . डोळ्यांनाही मर लागला होता. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्या अनुषंगाने पोलिसांनी चौकशीला सुरुवात केली होती. साक्षीदारांच्या म्हणण्यानुसार, मृत्यी झालेल्या इसमाने स्कुटी ओव्हरटेक करत पुढे जात होते. त्यांनी हेल्मेटही  घातले नव्हते . रात्रीची वेळ होती. गाडीला लाईट नसल्यामुळे ते खड्यात पडले. त्यामुळे स्वतःच्या मृत्यूला ते स्वतःच कारणीभूत ठरले आहेत

आणखी वाचा

Comments are closed.