पश्चिम बंगालमध्ये भाजपकडून ममता बॅनर्जींचा दारुण पराभव, राहुल गांधींचा धोक्याचा इशारा, म्हणाले.

पश्चिम बंगाल निवडणूक निकाल 2026 वर राहुल गांधी: सोमवारी (दि. 05) पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Election Result 2026) भाजपने (BJP) 207 जागा जिंकत ऐतिहासिक मुसंडी मारली आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या तृणमूल काँग्रेसचा (TMC) मोठा पराभव झाला असून तरी या निकालावर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संतप्त प्रतिक्रिया देत धोक्याचा इशारा व्यक्त केलाय. “हा केवळ एका पक्षाचा पराभव नसून भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या दिशेने भाजपने टाकलेले हे मोठे पाऊल आहे,” असा खळबळजनक दावा राहुल गांधींनी केला आहे.

Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: पराभवावर आनंद साजरा करणाऱ्यांना खडेबोल

राहुल गांधी यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्याच काँग्रेस पक्षातील आणि इतर विरोधी पक्षांतील नेत्यांना सुनावले आहे. ते म्हणाले, “काँग्रेसमधील काही लोक आणि इतर काही जण तृणमूल काँग्रेसच्या पराभवावर आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे नीट समजून घेतले पाहिजे की, आसाम आणि बंगालमधील जनमताची ही चोरी आहे. भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या भाजपच्या मोहिमेतील हे एक मोठे पाऊल आहे. क्षुल्लक राजकारण बाजूला ठेवा, ही लढाई केवळ एका पक्षापुरती मर्यादित नसून भारतासाठी आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

Rahul Gandhi on West Bengal Election Result 2026: इतर राज्यांच्या निकालांचा दिला संदर्भ

दरम्यान, गेल्या 24 तासांत राहुल गांधी यांनी दुसऱ्यांदा ममता बॅनर्जी यांची पाठराखण केली आहे. सोमवारी देखील त्यांनी ट्विट करत हटले होते की, आसाम आणि बंगाल ही निवडणूक भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने ‘चोरल्याची’ स्पष्ट उदाहरणे आहेत. आम्ही ममता दीदींशी सहमत आहोत. बंगालमध्ये 100 हून अधिक जागा ‘चोरल्या’ गेल्या. मध्य प्रदेश, हरियाणा, महाराष्ट्र आणि 2024 ची लोकसभा निवडणूक ज्या पद्धतीने हाताळली गेली, त्याच पद्धतीने बंगालचा निकाल फिरवला गेल्याचा आरोप त्यांनी केला होता.

आणखी वाचा

मराठी and Sanjay Dina Patil: मुंबईतील ठाकरेंच्या खासदाराच्या पत्नीचा अपघात, एकनाथ शिंदे विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात पोहोचले, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांना पुन्हा उधाण

आणखी वाचा

Comments are closed.