दिल्ली कॅपिटल्स 10 पैकी 6 सामने गमावूनसुद्धा प्लेऑफमध्ये पोहोचू शकते, जाणून घ्या संपूर्ण समीकरण
आयपीएल २०२६ मध्ये दिल्ली कॅपिटल्सची सद्यस्थिती चांगली नाही. अक्षर पटेलच्या नेतृत्वाखाली संघाने आतापर्यंत खेळलेल्या दहा सामन्यांपैकी सहा सामने गमावले आहेत. त्यांनी केवळ चार सामने जिंकले आहेत. यामुळे डीसी प्लेऑफमध्ये पोहोचू शकेल का? याचे उत्तर हो असे आहे, मात्र त्यांचा मार्ग काही सोपा नाही.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या पराभवानंतर डीसी गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे. त्यांनी १० पैकी चार सामने जिंकले असून त्यांचे ८ गुण झाले आहेत. या हंगामात डीसीचे अजून चार सामने बाकी आहेत. हे चारही सामने त्यांनी जिंकले तर ते १६ गुणांपर्यंत पोहोचतील. जर डीसीने १६ गुण मिळवले, तर त्यांना पहिल्या चारमध्ये स्थान मिळण्याची संधी आहे. त्यासाठी मात्र त्यांना नेट रनरेटमध्ये लक्ष द्यावे लागले, जो सध्या निगेटिव्ह आहे.
डीसीला १९ व्या आयपीएल हंगामाच्या प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आता एकही सामना गमावून चालणार नाही. जर त्यांनी एक सामना गमावला तर त्यांचे जास्तीत जास्त १४ गुण होतील आणि तेवढ्या गुणांसह प्लेऑफमध्ये पोहोचणे कठीण आहे. कारण सहा संघांचे आधीच १० किंवा त्याहून अधिक गुण आहेत. गुणतालिका पाहिली तर १४ गुणही प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी पुरेसे नाहीत.
डीसीचे पुढील चारपैकी दोन सामने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध असून एक सामना पंजाब किंग्ज आणि एक राजस्थान रॉयल्स विरुद्ध आहे. डीसीने २६४ धावा करून त्यांना पंजाबविरुद्ध खेळलेला घरचा सामना गमावला होता. राजस्थान संघही सध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. यामुळे डीसीला पुढील टप्प्यात पोहोचण्यासाठी हे चारही सामने जिंकणे आवश्यक आहे. केकेआरचा एक आणि आरआर विरुद्धचे सामने दिल्ली घरच्या मैदानावर खेळणार आहे, मात्र घरच्या मैदानावर संघ सध्या सामने गमावत आहेत.
आयपीएल २०२२ पासून १६ गुण मिळवलेला एकही संघ प्लेऑफमधून बाहेर झालेला नाही. याचा अर्थ १६ गुण एक योग्य पर्याय आहे.
Comments are closed.