उद्धव ठाकरे UNCUT PC : विश्वास ठेवा, हेच मी बेईमानीबद्दल म्हणतोय… शिवसेनेशी बेईमानी कोणी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, परभणी आणि हिंगोलीमधून निवडून दिलेले खासदार गद्दारी करत असले तरी, इथले शिवसैनिक आणि मतदार कायम शिवसेनेसोबत राहिले आहेत.त्यांनी इशारा दिला की, “गद्दारीची कीड ही महाराष्ट्र पोखरते त्या किडेला वेळेत जर का आपण चिरडलं नाही तर मग महाराष्ट्र वाचणार नाही, देश वाचणार नाही.” हे खासदार विकासासाठी नाही तर केवळ ‘खाजगी निधीसाठी’ पक्षांतर करून गेले आहेत, असा आरोप त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांच्या ‘विमानापेक्षा ईमान महत्त्वाचा’ या विधानावर पलटवार करताना ते म्हणाले, “ईमान राखवा.शिवसेना फोडण्यामागे भाजपमधील अंतर्गत गटबाजी असू शकते, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, हे ‘ऑपरेशन टायगर’ नसून ‘ऑपरेशन देवेंद्र’ असू शकते. देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेले तर त्यांच्या पंतप्रधान पदाची संधी निर्माण होऊ शकते, त्यामुळे त्यांना महाराष्ट्रातच गुंतवून ठेवण्यासाठी किंवा संपवून टाकण्यासाठी दिल्लीतील नेत्यांनी ही खेळी केली असू शकते, असा संशय ठाकरे यांनी व्यक्त केला. सध्याच्या महायुती सरकारला लोकांमध्ये “मराठा-मराठेतर करायचं, जातीपातीत संघर्ष निर्माण करायचा आणि सुख नाही व सत्ता भोगायची” आहे, असा घणाघात त्यांनी केला. सध्याच्या सरकारच्या ‘कर्जमाफी’ आणि आपल्या सरकारच्या ‘कर्जमुक्ती’मधील फरक त्यांनी स्पष्ट केला. ते म्हणाले, “माफी ही गुन्हेगाराला दिली जाते शेतकऱ्याला नाही. शेतकरी हा आपला अन्नदाता आहे या भावनेतन मी केलेली ती कर्जमुक्ती होती”. त्यांनी कोणत्याही अटी-शर्तींविना दोन लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केल्याची आठवण करून दिली.
Comments are closed.