लॉर्ड्सवरील ऐतिहासिक कसोटीमध्ये भारताचा दणदणीत विजय, इंग्लंडचा 270 धावांनी केला पराभव
महिला क्रिकेटमध्ये आज (13 जुलै) ऐतिहासिक सामन्याचा निकाल लागला. लॉर्ड्सवर खेळल्या गेलेल्या एकमात्र कसोटी सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने बाजी मारली आहे. भारताने चौथ्या दिवशी इंग्लंडचा 270 धावांनी मोठा पराभव केला. हा लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडवरील महिला संघांचा पहिलाच कसोटी सामना होता, ज्यामध्ये भारताने विजय मिळवला. त्याचबरोबर भारताला तब्बल 12 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी सामना जिंकण्यात यश आले आहे.
भारताचा पहिला डाव: 285/10
इंग्लंडचा पहिला डाव: 170/10
भारताचा दुसरा डाव: 341/7
इंग्लंडचा दुसरा डाव: 186/10
बातमी अपडेट होत आहे.
Comments are closed.