Sanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिका

Sanjay Raut PC | देशात तणाव पसरवणं भाजपचं काम, मोहन भागवत हे सहन कसं करताय, राऊतांची रोखठोक भूमिका

हे देखील वाचा

छत्रपती संभाजीनगर: मुघल शासक औरंगजेब आणि त्याच्या कबरीविषयी गेल्या काही दिवसांपासून, राजकीय नेत्यांकडून वादग्रस्त वक्तव्य केली जात आहेत. त्यातच आता भर पडलीय ती विश्व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाची. औरंगजेबची कबर तातडीने हटवण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे. यासंदर्भात तिथीनुसार उद्या शिवजयंतीच्या दिवशी औरंग्याची कबर (Aurangzeb kabar) हटाव मोहीम हाती घेण्यात येईल. औरंगजेबाची कबर न हटवल्यास, कारसेवा करु अशा इशारा बजरंग दलाकडून (Bajrang Dal) देण्यात आला आहे. शिवजयंतीला राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे औरंगजेबाच्या मुद्द्यावरुन राज्यातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

औरंग्याची कबर महाराष्ट्रात काय भारतात कुठेही नको. राज्य सरकारने पुढील काळात केंद्र सरकारशी चर्चा करुन औरंगजेबाची कबर नियमानुसार काढावी. नाहीतर बजरंग दल कारसेवा करुन ही कबर काढून टाकेल. ज्यांनी ज्यांनी स्वत:च्या भावाला मारलं, बापाला मारलं, हजारो हिंदूंचं धर्मांतर केलं, त्याची कबर महाराष्ट्रात असणं हे दुर्दैव आहे. त्यामुळे राज्य सरकारने ही कबर काढून टाकावी. अन्यथा बजरंग दल लाखोंच्या संख्येने छत्रपती संभाजीनगरकडे कूच करेल. आम्ही राज्य सरकारला सांगून औरंगजेबाची कबर उखडून टाकू, असा इशारा विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस सतर्क झाले आहेत.

Comments are closed.