6 तारखेला एक सामूहिक अत्याचार, प्राचार्यासह काही आरोपी 65 वर्षावरील; जितेंद्र आव्हाडांच्या पोस्

मुंबई: गेल्या काही दिवसांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलींवरती अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एका घटनेबाबत पोस्ट शेअर करून माहिती दिली आहे. 6 तारखेला एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील काही आरोपी हे 65 वर्षावरील आहेत. त्यामध्ये एक प्राचार्यही असल्याची धक्कादायक माहिती त्यांनी सोशल मिडियावरती केलेल्या पोस्टमध्ये दिली आहे.

त्याचबरोबर, या गुन्ह्यांमध्ये शासकीय विश्रामगृहाचा वापर करून तिथे सहा दिवस सातत्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. खरंतर हा गुन्हा नोंदविताना तेथील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो. प्रत्येक शासकीय विश्रामगृहात शासनाच्या आदेशाने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज न तपासता, केवळ राजकीय वैमनस्यातून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम हा गुन्हा नोंदवून पोलिसांनी केलेले आहे. माझे असे मत आहे की, पोलिसांचाही यामध्ये नाईलाज झाला आहे. कारण, सुरूवातीला पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र, वरून दबाव आल्यानंतर हा गुन्हा नोंदविला असल्याचीही माहिती जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये दिली आहे.

जितेंद्र आव्हाडांची पोस्ट काय?

आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट करत म्हटलं आहे की, “6 तारखेला एक सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यातील काही आरोपी हे 65 वर्षावरील आहेत. त्यामध्ये एक प्राचार्यही आहे.  या गुन्ह्य़ात शासकीय विश्रामगृहाचा वापर करून तिथे सहा दिवस सातत्याने त्या महिलेवर बलात्कार केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. खरंतर हा गुन्हा नोंदविताना तेथील सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचा पुरावा ठरतो. प्रत्येक शासकीय विश्रामगृहात शासनाच्या आदेशाने सीसीटीव्ही लावण्यात आलेले आहेत. या सीसीटीव्हीचे फुटेज न तपासता, केवळ राजकीय वैमनस्यातून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम हा गुन्हा नोंदवून पोलिसांनी केलेले आहे. माझे असे मत आहे की, पोलिसांचाही यामध्ये नाईलाज झाला आहे. कारण, सुरूवातीला पोलिसांनी हा गुन्हा नोंदवून घेण्यास नकार दिला होता. मात्र, वरून दबाव आल्यानंतर हा गुन्हा नोंदविला. यामध्ये अनेक बाबी अशा आहेत की त्या संशयास्पद आहेत. त्यामुळे या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी; उगाच गोरगरीबांचे चारित्र्यहनन करून त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचे काम करू नये. उद्या यातून एखाद्याने आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली तर यास जबाबदार कोण….??”.

अधिक पाहा..

Comments are closed.