गुणरत्न सदावर्ते मनोज जरांगेंचा मार्ग रोखणार?; पोलिसांकडे तक्रार, मोर्चाआधी नेमकं काय घडलं?

मराठा आरक्षणावरील गनरत्ना सादावर्ते: मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण (Maratha Reservation) मिळावे, यासह अनेक मागण्यांसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे मुंबईत धडकणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, या आंदोलनाला आता राज्यभरातील मराठा समाजाकडून समर्थन मिळत आहे? अशातच या आंदोलनाला विरोध करा करत वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी पोलीस प्रशासनाहीकडे तक्रार दाखल करण्याचा पवित्र घेतला आहे?

मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) यांना मुंबईत 29 तारखेला आंदोलन (Maratha Morcha in Mumbai) करू देण्यात येऊ नये, कारण सदर आंदोलन ही मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाच्या प्रलंबित केसवर दबाव आणणारा राजकारण आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे. त्यामुळे त्वरित त्यांना थांबवा. गुन्हा दाखल करा. अशी मागणी वकील गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांनी केली आहे?

पोलीस महासंचालकांसह पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक जालना यांना तक्रार दाखल

राज्यासह मुंबईत गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो? या उत्सवामध्ये मोठा अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सदर व्यक्ती करत आहेत आणि मुंबईमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांचा लोंढा आणून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करत आहेत. असेही गुणरत्न सदावर्ते आपल्या तक्रारीत म्हणाले आहे. मुंबईच्या जीडीपीघ्यावर देखील मोठा परिणाम होणार आहे. तेव्हा ही बाब परवडणारी नाही. या विरुद्ध डॉ. गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त, मुंबई पोलीस अधीक्षक जालना यांना तक्रारी दाखल केली आहेत. लवकरचआझाद मैदान पोलीस स्थानकात आज पोलीस तक्रार देण्याकरिता डॉ. गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटील जात असल्याची माहिती पुढे आली आहे?

मंजरसुंबा येथे पार पडलेल्या निर्णायक सभेत चोरट्यांनी केले हात साफ

मनोज जरांगे पाटील यांच्या काल झालेल्या सभेत चोरट्यांनी सोनसाखळी, मंगळसूत्र दागिन्यांसह रकमेवर हात साफ केलेत. याप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर रविवारी मांजरसुंबा परिसरात मनोज जरांगे पाटील यांची निर्णायक इशारा सभा पार पडली. या सभेत मोठ्या संख्येने मराठा समाज सहभागी झाला होता. यावेळी अनेक जणांच्या अंगावरील सोन्यावर आणि रोख रकमेवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे.

बापू नवले यांची तब्बल दहा तोळ्यांची सोन्याची साखळी चोरीला गेली. नवले यांच्या तक्रारीनुसार दहा तोळ्यांच्या सोनसाखळीची किंमत सहा लाख वीस हजार रुपये आहे. तर याच सभेतून दीपक जोगदंड यांची सोन्याची साखळी तर इतर दोघांच्या सोन्याच्या साखळ्या लंपास करण्यात आल्यात. शिवाय एका महिलेचे मनी मंगळसूत्रही चोरीला गेले आहे. पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तपास सुरू केलाय. या सर्व घटनांप्रकरणी नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला गेलाय.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.