बावनकुळेंनी ‘काका मला वाचवा’ हाकेला ओ दिलाय, अजितदादांचा राजीनामा घेणं दुरुच, पण…; अंबादास दा


चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर अंबादास दानवे : मुंढवा येथील वादग्रस्त जमिनीच्या खरेदी व्यवहारावर गैरप्रकाराचे आरोप झाल्यानंतर अमेडिया कंपनीने तो व्यवहार रद्द केला होता. तथापि, या कंपनीला बुडवलेले मुद्रांक शुल्क आणि दंड या स्वरूपात 42 कोटी रुपयांची वसुली करण्याचे आदेश मुद्रांक शुल्क विभागाने नोटिशीद्वारे दिले होते. या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुंढवा येथील वादग्रस्त जागेचा व्यवहार रद्द करायचा आहे, तर ४२ कोटी रुपयांची नोटीस का दिली? असा सवाल उपस्थित केला. बावनकुळे यांनी आपल्या खात्यातीलच अधिकाऱ्यांच्या कृतीवर अविश्वास व्यक्त केल्याने प्रशासनात आणि राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आता या प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर हल्लाबोल केलाय.

Ambadas Danve on Chandrashekhar Bawankule: नेमकं काय म्हणाले अंबादास दानवे?

अंबादास दानवे ‘एक्स’वर पोस्ट करत म्हणाले की, तुमच्या विभागाचे अधिकारी दुप्पट दंड भरा म्हणून सांगतात, आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही म्हणता की ‘तपासावे’ लागेल! अधिकाऱ्यांचा बळी द्यायचा होता तेव्हा तासाभरात निलंबनाची कागदे थेट बाजारात आणली गेली. आता पार्थ पावरांशी निगडित निर्णय घ्यायची वेळ आली की यांचा ‘अभ्यास’ सुरू झाला. ‘काका मला वाचवा’, या हाकेला ओ दिला आहे बावनकुळे यांनी. अजित दादांचा राजीनामा घेणे तर दूरच. आता त्यांच्या सुपुत्राच्या खिशाला चटका बसणार नाही, याची जबाबदारी मेवाभाऊंनी बावनकुळेंना दिलेली आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा हल्लाबोल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर केलाय.

Chandrashekhar Bawankule: काय म्हणाले होते चंद्रशेखर बावनकुळे?

पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीने खरेदी केलेल्या वादग्रस्त जमीन प्रकरणावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाष्य केले होते. ते म्हणाले होते की, हा सरकारी जागेचा व्यवहार आहे. नोटिशीमधून जे ४२ कोटी येणार आहेत, ते नेमके कशाचे आहेत, ते मला तपासावे लागेल. कारण, आपण व्यवहार रद्द करतो आहोत. व्यवहार रद्द करताना ४२ कोटी का घ्यायचे, त्यासाठी नोटीस का दिली गेली, हेही तपासावे लागेल. जमिनीच्या खरेदी-विक्रीमध्ये प्रथमदर्शनी दोषी दिसणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमली आहे. या समितीला एका महिन्यात अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. हा अहवाल आल्यानंतर सर्व गोष्टी स्पष्ट होतील. यामध्ये आणखी कोणी दोषी आढळले, तर त्यांच्यावरही कारवाई होईल, असे बावनकुळे यांनी म्हटले होते.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Ajit Pawar NCP: पक्षाने आम्हाला को#* तर आम्हीदेखील पक्षाला को#*शिवाय राहणार नाही, पुण्यातील नेत्याचा अजितदादांना गर्भित इशारा

आणखी वाचा

Comments are closed.