बच्चू कडूंच्या आंदोलनामुळे 4 महामार्ग ठप्प, सामान्य नागरिकांची कोंडी, महिला चिडून म्हणाली…


बच्चू कडू शेतकरी आंदोलन : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर – वर्धा आणि जबलपूर – हैदराबाद महामार्गासh इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी गेल्या १५ तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. अशातच एका कष्टकऱ्यासाठी दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत का आणता? असा थेट प्रश्न करत अडचणीत अडकलेल्या महिलांni बच्चू कडू यांना थेट प्रश्न केला आहे.

बाकस कडू शेतकरी आंदोलन : वाहतूक कोंडीमुळे तब्बल 14 ते 15 तास सामान्य नागरिक अडकलेले; अनेकांची पायपीट

नागपूरात्री बच्चू कडू यांच्या सोबत दाखल झालेल्या आंदोलकांनी रोखून धरल्याने दोन्ही रस्त्यांवर दोन्ही बाजूला अनेक किमीपर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनामुळे आउटर रिंग रोडवर झालेल्या वाहतूक कोंडीमुळे तब्बल 14 ते 15 तास अडकलेले अनेक कुटुंब आणि सामान्य नागरिक आता पायीच महामार्गावर पुढच्या दिशेने निघाल्याचे चित्र दिसून येत आहे. अनेक महिलांनी संपूर्ण रात्र महामार्गावर एसटी बस किंवा खाजगी वाहनांमध्येच काढली आहे. सकाळी मात्र हातात सोबतचे जड साहित्य आणि लेकरांना घेऊन महिलांचे ग्रुप्स आऊटर रिंग रोडवर आपल्या पुढच्या डेस्टिनेशनच्या दिशेने पायी निघालेले पाहायला मिळत आहे.

दरम्यानअनेक महिलांनी बच्चू कडू यांच्या संदर्भात तीव्र रोष व्यक्त करत एका कष्टकऱ्यासाठी बच्चू कडू तुम्ही आंदोलन करत आहात, मात्र दुसऱ्या कष्टकऱ्याला अडचणीत आणत आहात, असे प्रश्न महिलांनी उपस्थित केले आहे.

नागपूर शेतकरी आंदोलन : महामार्गावर व्वानांच्या लांबच लांब रांगा; सर्वसामान्यांचे अट

बच्चू कडू आणि त्यांच्या आंदोलकांमुळे फक्त नागपूर – वर्धा महामार्गावरच कोंडी झालेली नाही. तर एका बाजूला नागपूर – अमरावती आणि दुसऱ्या बाजूला नागपूर – रायपूरला दरम्यानचे जे दोन समांतर महामार्ग आहे, त्यांना जोडणाऱ्या आऊटर रिंग रोडवर ही आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे आऊटर रिंग रोडवर ही कित्येक किलोमीटर पर्यंत ट्रक आणि अत्यावश्यक वस्तू घेऊन जाणाऱ्या वाहनांची कोंडी झाली आहे.

विविध उद्योगांमध्ये कच्चा माल घेऊन जाणार ट्रक, बाजारपेठांमध्ये भाजीपाला घेऊन जाणारे वाहन आणि नागपुरात काही कामानिमित्ताने खाजगी वाहनातून आलेले सामान्य नागरिक सर्वच आऊटर रिंग रोडवर अनेक किलोमीटरच्या ट्रॅफिक जाम मध्ये अडकून पडले आहे. काल संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारास आउटर रिंग रोडवरची वाहतूक आंदोलकांनी थांबवली होती, तेव्हापासून कित्येक तास जेवण पाणी शिवाय सामान्य नागरिक आणि ट्रकचालक अडकून पडले आहे. ज्यांच्या मोबाईलला रेंज आहे ते आपल्या कुटुंबीयांशी संपर्क साधू शकत आहे. अन्यथा अनेकांचे स्वकीयांशी संपर्क सुद्धा होत नाही आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.