जयंत पाटलांवर गलिच्छ शब्दात टीका, देवेंद्र फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान; म्हणाले…

Devendra Fadnavis On Gopichand Padalkar: भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. गोपीचंद पडळकरांच्या या विधानावरुन शरद पवार गट आक्रमक झाला आहे. तसेच शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फोन करत गोपीचंद पडळकरांनी केलेल्या विधानावरुन नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांनी जे विधान केलंय ते योग्य आहे, असं माझंही मत नाही. कोणाच्याही वडिलांबद्दल किंवा परिवाराबद्दल विधान करणं योग्य नाही. या संदर्भात गोपीचंद पडळकर यांच्याशी मी बोललेलो आहे त्यांनाही मी सांगितलंय, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच मला शरद पवारांचा फोन आला होता. मीही त्यांना सांगितलं, अशा प्रकारच्या विधानाचं आम्हीही कधीच समर्थन करणार नाही.

गोपीचंद पडळकरांना भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी- देवेंद्र फडणवीस

गोपीचंद पडळकर हे एक तरुण नेते आहेत. अतिशय आक्रमक नेते आहेत. अनेकवेळा आक्रमकपणा दाखवत असताना आपल्या बोलण्याचा नेमका काय अर्थ निघेल ते लक्षात येत नाही, आणि म्हणून मी गोपीचंद पडळकरांना हे सांगितलेलं आहे की हे लक्षात घेऊनच आपण विधान केलं पाहिजे. तुम्हाला (गोपीचंद पडळकरांना) भविष्यात चांगला नेता म्हणून मोठी संधी आहे. आपण बोलत असताना काय विचार निघतील, याचा विचार करायला हवा, असा मी सल्ला गोपीचंद पडळकरांना सल्ला दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीसांनी माध्यमांशी बोलताना दिली.

गोपीचंद पडळकर नेमकं काय म्हणाले होते? (What Gopichand Padalkar say?)

गोपीचंद पडळकर यांनी सांगली जिल्ह्यातील जत विधानसभा मतदारसंघात बोलताना, जयंत पाटील यांच्यावर गलिच्छ शब्दात टीका केली होती. जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, अशी पातळी सोडून टीका गोपीचंद पडळकर यांनी केली होती. जयंत पाटलांनी मला एका कंत्राटदाराच्या आत्महत्या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला.  याने महाराष्ट्र कसा चालवला, जयंत पाटील हा बिनडोक माणूस आहे. दर आठ दिवसाला हा आपण किती बिनडोक आहे हे जयंत पाटील सिद्ध करतोय. फंडाबाबत आमदार पत्र देऊ शकतो. त्या व्यतिरिक्त आमदाराचा आणि कंत्राटदाराचा काही संबंध येत नाही. जयंत पाटलाचे काम फक्त गोपीचंद पडळकरला बदनाम करण्याचं आहे. पण मी काय आता आलोय का? असे अनेक अंगावर घेऊन आलोय. या प्रस्थापितांच्या सत्ताकारणामध्ये दोन-दोन महिने मी जेलमध्ये जाऊन आलोय. जतमध्ये जयंत पाटलांनी माणसे पाठवली. गोपीचंद पडळकरांनी कोणत्या व्यापाऱ्याकडून पैसे घेतले का याची माहिती घेतली. जर मी कुणाकडून पैसे घेतले असतील तर खंडणीचा गुन्हा दाखल करता येतो का पाहिलं. पण हा गोपीचंद पडळकर जयंत पाटलासारखा भिकाऱ्याची औलाद नाही. कार्यक्रम घेण्याची धमक आपल्यामध्ये आहे. हा जयंत पाटील राजारामबापू पाटील यांची औलाद नसणार आहे. काहीतरी गडबड आहे, असं विधान गोपीचंड पडळकर यांनी केलं होतं.

https://www.youtube.com/watch?v=vrv6hdestdu

संबंधित बातमी:

Sharad Pawar On Gopichand Padalkar मोठी बातमी: गोपीचंद पडळकरांची जयंत पाटलांवर गलिच्छ टीका, शरद पवारांनी फडणवीसांना फोन लावून सुनावलं!

आणखी वाचा

Comments are closed.