काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेगटात गेले, कसब्यात धंगेकर अजूनही ‘जनतेच्या मनातील आमदार’? जोरदार
रवींद्र धनगेकर: काँग्रेसला सोडचिठ्ठी देत माजी आमदार रविंद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar) शिवसेना एकनाथ शिंदे गटात (10 मार्च)रोजी प्रवेश केला. त्यांच्या पक्षांतरानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी धंगेकर..काय होतास तू..काय झालास तू म्हणत धंगेकरांच्या पक्षप्रवेशावरून टीका केली. दरम्यान, शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पुण्यातील शिंदेगटातील कार्यकर्त्यांमध्ये,पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता असल्याचं सांगितलं जात आहे. पण आता कसब्यात जनातेच्या मनातील आमदार अशा मजकुराची बॅनरबाजी होताना दिसत आहे. शिवसेना पक्षात पक्षप्रवेश करताच कसबा मतदारसंघातील रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांकडून वाढदिवसानिमित्त ही बॅनरबाजी होताना दिसतेय. विधानसभा निवडणूकीत भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून रवींद्र धंगेकर यांचा पराभव झाला होता. विधानसभा काँग्रेस पक्षाकडून लढल्यानंतर आता शिंदेगटात पक्षप्रवेश केल्यानंतर धंगेकरांचे पुण्यात बॅनर झळकले आहेत. (Pune)
काँग्रेस सोडण्यामागे कारण काय?
रवींद्र धंगेकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. काँग्रेस सोडताना दु:ख व्यक्त होत असल्याची भावना यावेळी रवींद्र धंगेकर यांनी सांगितले. पक्ष सोडताना दुःख होत आहे. सत्ता असल्याशिवाय काम होत नाहीत. असंही धंगेकर म्हणाले.कार्यकर्ते मतदारांचा आदर करूनच प्रवेश करणार आहे, असे रवींद्र धंगेकर म्हणाले आहेत. दरम्यान रवींद्र धंगेकरांना काँग्रेसकडून शहराध्यक्षपदाची ऑफर, तरीही कोणावर नाराज होऊन पक्ष सोडणार? का यावर धंगेकरांनी मा पक्षाचा आभारी आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिलं आहे असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
‘मी पहिल्यांदाच काँग्रेस पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्य़कर्ते आणि मतदारांचा आभारी आहे. मी त्यांचा कायम आभारी आहे. माझी विचारसरणी मानवतवादी आहे. काँग्रेसने माझ्यासारख्याला त्यांनी विधानपरिषद, लोकसभा अशी उमेदवारी दिली. शेवटी जनता ठरवते कोणाला निवडून द्यायचं नाही, कोणाला नाही? काँग्रेसचे पुण्यातील कार्यकर्ते उत्साही आणि काम करणारे आणि प्रेमळ आहेत. पक्षाचे पदाधिकारी चांगल्याप्रकारे माझ्या पाठी उभे राहिले. निवडणुकीत दोनवेळा उभा राहून माझा पराभव झाला, पण मी कोणाला दोष दिला नाही. काँग्रेस पक्ष सोडणे सोपे नाही. पण माझ्या मतदारसंघातील लोकांशी चर्चा घेऊन कठीण निर्णय घेण्याची वेळ आली. शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी मला अनेकदा फोन केली. धंगेकर आमच्याकडे या, अशी ऑफर दिली. आमच्यात मित्रत्त्वाचं नातं आहे.त्यामुळे एकत्र काम करण्याचे ठरवले. मी त्यांना सात वाजता भेटून पुढील निर्णय घेईन, असे रवींद्र धंगेकर यांनी म्हटले.
अधिक पाहा..
Comments are closed.