शेतकऱ्यासह भाजपा नगरसेवकावर पोलिसांचा लाठीचार्ज; पवनचक्की वादातून शेतात तणाव
धाराशिव : बीड आणि धाराशिव (dharashiv) जिल्ह्यातील पवनचक्कीच्या वादातून सातत्याने गुन्हेगारी किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. वाशी तालुक्यातील तांदुळवाडी येथील हा अमानुष प्रकार आहे. पवनचक्की विद्युत लाईन टॉवरचा मावेजा देऊन काम करा अन्यथा काम थांबवा अस म्हणणाऱ्या शेतकऱ्यांवर पोलिसांनी (Police) अमानुष लाठीमार केल्याचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओवरुन संताप व्यक्त हो आहे. विशेष म्हणजे भाजपच्या (BJP) माजी नगरसेवकावरच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने स्थानिक राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. तर, पोलिसांनी स्पष्टीकरण देताना संभाव्य धोका टाळण्यासाठी लाठीचार्ज केल्याचं म्हटलं आहे.
वाशी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात सदरील घटना घडली असून शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतातून पवनचक्की विद्युत लाईनचे 2 टॉवर गेले आहेत. एका कंपनीकडून जेवढा मावेजा मिळाला आहे, तेवढाच मावेजा दुसऱ्या कंपनीने द्यावा, अशी माफक अपेक्षा शेरकर यांची होती. त्यामुळे त्यांनी शेतात सुरू असलेल्या टॉवरचे काम थांबवले होते. मात्र, पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मावेजा देण्याऐवजी पोलिसांना पाचारण करून शेतकऱ्यांना दमदाटी सुरू केली. यावेळी भाजपा नगरसेवक राजू कवडे यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी शेतकरी आणि भाजपा माजी नगरसेवक राजू कवडे यांच्यावर अमानूष लाठीमार केल्याची घटना घडली. यावेळी, भाजप माजी नगरसेवक ज्वलनशील पदार्थ घेऊन आले होते, त्यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी लाठीचार्ज केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस उप-अधीक्षकांकडून स्पष्टीकरण
राजू कवडे या व्यक्तीने 5 ते 6 लिटर डिझेल असलेला ड्रम घेऊन गर्दीत स्वतःच्या आणि सगळ्यांच्या अंगावर पडेल अशाप्रकारे ओतला. त्यामुळे संभाव्य धोका टाळण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला असल्याची माहिती धाराशिवचे डी.वाय.एस.पी स्वप्निल राठोड यांनी दिली.
हेही वाचा
भाजपसोबत बंडखोरी करत विधानसभा लढवली; भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष भोईर शिंदेंच्या शिवसेनेत
आणखी वाचा
Comments are closed.