महिलेला मराठी म्हणत हिणवलं, शिवसैनिकांनी बँक अधिकाऱ्याला कानशि‍लात लगावली; व्हिडिओ व्हायरल

धुळे : मराठी आणि अमराठी हा वाद प्रामुख्याने मुंबईत पाहायला मिळतो. मात्र, मुंबबी) मराठी माणसांच्या पाठीशी मनसे आणि शिवसेना हे पक्ष प्राधान्याने उभे राहतात. अनेकदा वेगवेगळ्या प्रसंगातून हे समोर आलं आहे. गेल्याच महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी बँकांमध्ये मराठी बोलणे आणि मराठीत व्यवहाराच्या अनुषंगाने मनसैनिकांना आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर, मनसे पदाधिकाऱ्यांनी स्थानिक बँकांमध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांसोबत मराठीच्या मुद्द्यावरुन चांगलाच गोंधळ घातल्याचं पाहायला मिळालं. आता, धुळे शहरातही ठाकरेंच्या शिवसैनिकांनी (Shivsena) बँकेत जाऊन अमराठी अधिकाऱ्या कानशि‍लात लगावल्याची घटना घडली. शिवसेना पदाधिकाऱ्याने ब्रँच लोन विभागाच्या अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.

धुळे शहरातील देवपूर परिसरात असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) प्रमोद नगर शाखेचे ब्रँच मॅनेजरने ITI महिला प्राध्यापिकेला ‘तुम्ही मराठी असेच आहात असे हिणवत मराठी लोकांविषयी अपमानजनक शब्द’ वापरल्यामुळे आज शिवसेना उबाठा गटाच्या शिवसैनिकांनी बँकेच्या शाखेत जाऊन जाब विचारला. यावेळी SBI बँकेच्या लोन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बँक मॅनेजरची बाजू घेऊन महिलेला अरेरावी केली होती. म्हणून शिवसेनेचे महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी तेथील लोन ऑफिसर सदाशिव अजगे यांच्या कानशिलात लगावली. यावेळी ठाकरेंचे शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, शिवसैनिकांकडून यावेळी बँक मॅनेजर अतुल गांधी यांचा निषेध करण्यात आला. बँकेतील कर्मचाऱ्यांनी महिलेची माफी मागितली असून SBI बँक मॅनेजर अतुल गांधी यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे. मात्र, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी थेट मारहाण केल्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी नाराजी दर्शवली.

बँकेतील कर्मचाऱ्यांबद्दल नागरिकांमध्ये नाराजी

दरम्यान, सर्वसामान्य नागरिकांची बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांबाबत सातत्याने तक्रार असते. बँकेतील कर्मचारी काम करण्याऐवजी काम टाळण्यातच पटाईत असतात. विनाकारण फिरवाफिरवी केली जाते, अनेकदा कर्जप्रकरणी नाही.. हा शब्द त्यांच्या तोंडी असतो. तर, बँकेतील काही अमराठी अधिकारी जाणीवपूर्वक उद्धटपणे वागतात. ग्राहकांना, शेतकऱ्यांना सन्मानाने वागणूक देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने येत असतात.

हेही वाचा

मुंबईकरांसाठी ‘लोकल’च्या तीन नव्या डिझाईन; मुंब्रा अपघातानंतर रेल्वेमंत्र्यांनी घेतली बैठक

आणखी वाचा

Comments are closed.