अजित पवारांवर शिंदे गटाचे मंत्री नाराज, कॅबिनेटनंतर पडद्यामागच्या हालचालींना वेग

महाराष्ट्र राजकारण मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली काल मंगळवारी (24 जून) मंत्रालय, मुंबई येथे राज्य मंत्रिमंडळ बैठक संपन्न झाली. मात्र या कॅबिनेट बैठकीनंतर शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादीत (NCP) नाट्यमय बैठकांचं सत्र पाहायला मिळालं आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेना मंत्र्यांबरोबर बैठक (Shiv Sena Minister Meeting) झाल्यानंतर मंत्री उदय सामंतांकडून (Uday Samant) अजित पवारांची भेट घेण्यात आली. तर त्यानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे या दोन उपमुख्यमंत्र्यांचीही भेट घडून आल्याचे बघायला मिळाले आहे. आगामी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांना सामोरं जाण्यापूर्वी निधी वाटपाचा घोळ संपावा, याकरता उदय सामंतांनी पुढाकार घेत बैठकीत आपल्या पक्षाची बाजू मांडली असल्याचे बोललं जात आहे.

तर निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत (Ajit Pawar) शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंतावर टाकण्यात आली असल्याची ही माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्यांच्या शिष्टाईची महायुतीतील समन्वय राखन्यास कशी मदत होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत

दरम्यान, निधीवाटपात शिवसेना मंत्र्यांना सापत्न वागणूक दिली जात असल्याच्या नाराजीवर तोडगा काढण्यासाठी शिवसेनेकडून तातडीची पावले उचलली जात आहेत. त्यामुळेच निधी वाटपबाबत शिवसेना मंत्र्यांची नाराजी पहाता अर्थमंत्री अजित पवारांपर्यंत शिवसेनेची भूमीका पोहोचवून तोडगा काढण्याची जबाबदारी उदय सामंत यांना देण्यात आली आहे. सोबतच आगामी निवडणूकीत मतदारांसमोर जातांना पुरेसा निधी आणि विकासकामे गरजेची आहेत. याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याची चर्चा आहे.

निधी वाटप करतांना कोणत्या कामासाठी किती निधी दिला जावा, यात शिवसेनेत पक्षीय पातळीवरही समन्वय राखला जावा, निधीवाटपात सूसुत्रता यावी याकरता अर्थमंत्री अजित पवार आणि शिवसेना मंत्र्यांमध्ये संवादाचा पूल म्हणून उदय सामंत काम करतांना दिसत आहेत. शिवाय उदय सामंत यांचे शिवसेनेत मंत्री म्हणून वजन आहेच. सोबतच राष्ट्रवादीतही जून्या सहकाऱ्यांसोबत ते चांगले संबंध ठेवून आहेत. त्यामुळे उदय सामंत हे रायगडच्या पालकमंत्रीपदाच्या तिढ्यावरही समन्वयकाचीच भूमीका पार पाडत आहेत. असं देखील बोललं जात आहे. त्यामुळे शिवसेनेत उदय सामंत यांच्याकरवी निधीवाटपाबाबत समाधानकारक तोडगा निघेल, अशी अपेक्षा शिवसेना नेत्यांना आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.