शॉकिंग! आई-वडिलांनी मोबाईल न दिल्याने 14 वर्षीय मुलीने घरातच संपवलं जीवन; मुंबईतील धक्कादायक घट
मुंबई आत्महत्या प्रकरण: मुंबईतील गोरेगाव पूर्व भागातून धक्कादायक घटनासमोर आली आहे. अरे कॉलनीत राहणाऱ्या अवघ्या 14 वर्षांच्या शाळकरी मुलीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आई-वडिलांनी मोबाईल न दिल्यामुळे मुलीने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे. अरे पोलीस ठाण्याच्या हद्दीत युनिट 22 मध्ये ही घटना घडली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. (Mumbai News)
नेमकं घडलं काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील गोरेगावमधील आरे कॉलनीत ही धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्या केलेल्या 14 वर्षांची मुलगी गेल्या काही दिवसांपासून आई-वडिलांकडे सतत मोबाईल मागत होती. आई-वडिलांनी मोबाईल देण्यास नकार दिल्याने अनेकदा घरात वादविवाद झाले. मोबाईल न दिल्यामुळे मुलीचे आई वडिलांशी भांडण झाले. शेवटी आई-वडील कामानिमित्त बाहेर गेले असता दुपारी दोन वाजता मुलीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. आई वडील परत येताच ही बाब आई-वडिलांच्या लक्षात आली. त्यांनी तात्काळशी स्थानिकांच्या मदतीने पोलीस प्रशासनाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच आरे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा केला. मुलीचे पार्थी व शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून आरे पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून मोबाईल न मिळाल्यामुळे 14 वर्षांच्या मुलीने इतका टोकाचा निर्णय घेतल्यानं मोबाईलच्या व्यसनामुळे मुलीच्या आत्महत्येकडे लक्ष वेधले गेले आहे.
25 वर्षीय प्रियकराने 36 वर्षीय प्रेयसीची केली हत्या
बेंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या रूममध्ये एका तरूणाने आपल्या 36 वर्षीय प्रेयसीची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, ही घटना शुक्रवारी घडली आहे. घटनेची माहिती मिळताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली. पोलिसांनी घटनेची माहिती देताना सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउट येथील ओयो हॉटेलच्या खोलीत त्याची प्रेयसी 36 वर्षीय हरिनी हिची हत्या केल्याचा आरोप आहे. दोघेही केंगेरी येथील रहिवासी असल्याचे समजते.
बेंगळुरू पोलिसांनी सांगितले की, 25 वर्षीय यशने पूर्णा प्रज्ञा लेआउटमधील एका ओयो हॉटेलच्या रूममध्ये त्याची प्रेयसी हरिनी (36) हिची चाकूने वार करून हत्या केली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी यश हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. मृत महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते, परंतु कालांतराने ती महिला हळूहळू आरोपींपासून दूर जात होती. याचा राग येऊन आरोपीने महिलेची हत्या केली.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.