34 षटकार, 39 चौकार अन् 499 धावा…. हॅरी ब्रूकने कोणावर फोडलं पराभवाचं खापर?
भारत विरुद्ध इंजी उपांत्य फेरी T20 विश्वचषक 2026 : टी-20 वर्ल्ड कप 2026 चा दुसरा सेमीफायनल सामना… मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज जे घडलं, ते क्रिकेटच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. 34 षटकार, 39 चौकार आणि तब्बल 499 धावांचा पाऊस पडला. मात्र, या तुफानी धावांच्या खेळात इंग्लंडचे स्वप्न भंगलं आणि भारताने फायनलमध्ये धडक मारली. भारताकडून 7 धावांनी पराभव झाल्यानंतर यजमान संघाच्या डावात इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुकने कबूल केले की त्याने संजू सॅमसनला बाद करून मोठी चूक केली होती, ज्याने नंतर अर्धशतक झळकावले आणि सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक काय म्हणाला?
सामना संपल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूक म्हणाला की, आम्हाला वाटलं होतं की ताजी खेळपट्टी असल्यामुळे सुरुवातीला चेंडू थोडा थांबेल आणि पहिल्या डावात फिरकी गोलंदाजांना जास्त मदत मिळेल. पण प्रत्यक्षात तसं घडलं नाही. भारताने फलंदाजी करताना अप्रतिम खेळ केला. आजच्या सामन्यात आणि संपूर्ण स्पर्धेत आमच्या सर्व खेळाडूंनी ज्या पद्धतीने खेळ केला, त्याचा आम्हाला अभिमान आहे.
कुठे झाली मोठी चूक?
हॅरी ब्रूक म्हणाला की, मी प्रामाणिकपणे कबूल करतो की संजू सॅमसनचा कॅच सोडणं ही माझी मोठी चूक होती. क्रिकेटमध्ये एक जुनी म्हण आहे, कॅच पकडा आणि मॅच जिंका (Catches win matches), आणि आज मैदानात गोष्टी आमच्या बाजूने गेल्या नाहीत. शेवटी त्याची किंमत आम्हाला मोजावी लागली.
पुढे तो म्हणाला, गोलंदाजीतही काही ठिकाणी आम्ही फसलो. आम्ही जसं करायला हवं होतं तसं पूर्णपणे करू शकलो नाही. भारताचे फलंदाज जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी आहेत आणि त्यांच्या विरोधात जर थोडीही चूक झाली, तर चेंडू थेट सीमारेषेबाहेर जातो. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही अपेक्षेप्रमाणे अंमलबजावणी करू शकलो नाही. तरीही आम्ही पूर्ण ताकदीने लढलो, पण दुर्दैवाने निकाल आमच्या विरोधात गेला.
जेकब बेथेलबद्दल काय म्हणाला हॅरी ब्रूक?
जेकब बेथेलबद्दल बोलायचं झालं तर तो आज अप्रतिम खेळला. भविष्यात तो आपल्या कारकिर्दीत खूप नाव आणि पैसा कमावेल, याबद्दल मला खात्री आहे. त्याने आज जगाला दाखवून दिलं की तो किती मोठा खेळाडू बनू शकतो. जरी निकाल आमच्या विरोधात गेला असला, तरी त्याची खेळी या स्पर्धेतील आमच्यासाठी मोठी सकारात्मक गोष्ट आहे. पहिल्याच चेंडूपासून त्याने आक्रमक खेळ करत सगळ्यांना आपली क्षमता दाखवून दिली, तो क्षण खरोखर खास होता.
शेवटी तो म्हणाला, एकंदरीत पाहिलं तर आम्ही चांगली स्पर्धा खेळलो. मी आधीही सांगितलं होतं की आम्ही कधीही सामना सोडत नाही, आणि आज पुन्हा ते सिद्ध झालं. 250 धावांचा पाठलाग करताना इतर काही संघ कोसळले असते, पण आम्ही शेवटपर्यंत लढत राहिलो. आम्ही पूर्ण प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आज निकाल आमच्या बाजूने लागला नाही.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.