ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकांसाठी टीम इंडिया जाहीर! नेतृत्वपदं ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांच्याकडे

ऑस्ट्रेलिया अ संघ सप्टेंबर ते ऑक्टोबर कालावधीत भारताच्या दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन बहुदिवसीय आणि तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. या सामन्यांसाछी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने आज (बुधवार, ९ ऑगस्ट) संघाची घोषणा केली आहे.यामध्ये भारतासाठी खेळलेल्या प्रमुख खेळाडूंचा भरणा आहे. एकदिवसीय सामन्यांचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड, तर बहुदिवसीय सामन्यांचे नेतृत्व देवदत्त पडिक्कल करणार आहे.
यामध्ये पहिले बहुदिवसीय सामने खेळले जाणार आहेत. कसोटी स्वरूपाचे हे दोन्ही सामने प्रत्येकी चार दिवस खेळले जातील. यातील पहिला सामना २२ ते २५ सप्टेंबर दरम्यान आणि दुसरा सामना २९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान खेळले जातील. या सामन्यांसाठीचे भारत अ संघाचे नेतृत्व देवदत्त पडिक्कल करणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामने खेळले जाणार आहेत.
एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना ६ ऑक्टोबर रोजी, दुसरा सामना ९ ऑक्टोबर रोजी आणि तिसरा सामना ११ ऑक्टोबर रोजी खेळला जाणार आहे. हे सर्व सामने पुद्दुचेरी येथे खेळले जाणार आहेत.
हार्दिकचाही संघात समावेश
भारताच्या मुख्य संघातून बऱ्याच काळापासून बाहेर असणाऱ्या हार्दिक पंड्याचा एकदिवसीय संघात समावेश करण्यात आला आहे, मात्र त्याच्या संघात समावेश फिटनेसच्या मंजुरीवर आधारित आहे.
भारत एक बहु-दिवसीय संघ – अमन मोखाडे, आयुष पांडे, देवदत्त पडिक्कल (कर्णधार), साई सुदर्शन (उपकर्णधार), यश राठोड, शेख रशीद, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), शम्स मुलाणी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, अंशुल कंबोज, प्रफुल्ल हिंगे, एन जगदीसन (विकेटकीपर), नचिकेत भुते, व्ही वैशाख*.
भारत एक दिवसीय संघटना – प्रियांश आर्य, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रजत पाटीदार, कुमार कुशाग्रा (विकेटकीपर), निशांत सिंधू, विपराज निगम, अर्शीन कुलकर्णी, अर्शद खान, नमन धीर, हार्दिक पंड्या*, प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर),गुरजापनीत सिंग, यश ठाकुर.
(*फिटनेस क्लिअरन्सच्या अधीन)
Comments are closed.