आज ठरणार भारताचं भविष्य! पुरुष संघाची प्रतिष्ठा, महिला संघाचं सेमीफायनलचं स्वप्न पणाला

आज (रविवार, 28 जून) क्रिकेटच्या रोमांचक सामन्यांचा दिवस आहे. यात भारतीय पुरुष आणि महिला संघांचे प्रत्येकी एक असे दोन महत्त्वाचे सामने खेळले जाणार आहेत, ज्यांचे थेट प्रक्षेपण विविध टीव्ही चॅनेल आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

एकीकडे, भारतीय पुरुष संघ आयर्लंडविरुद्ध दुसरा टी-20 सामना खेळणार आहे. पहिल्या सामन्यात आयर्लंडने भारताचा 34 धावांनी पराभव करून दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. जर भारत दुसरा सामनाही हरला, तर आयर्लंड भारतांविरुद्ध आपली पहिली टी-20 मालिका जिंकण्याचा पराक्रम करेल.

दुसरीकडे, भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध मैदानात उतरेल आणि आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (सेमी-फायनल) स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारताला हा सामना जिंकणे अत्यंत आवश्यक आहे.

सामने कधी आणि कुठे खेळले जातील?

भारत विरुद्ध आयर्लंड आणि भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ असे दोन्ही सामने आज, रविवारी (२८ जून) होणार आहेत. भारत आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा टी-20 सामना बेलफास्ट येथे होईल. हे तेच मैदान आहे जिथे भारताला पहिल्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. तर, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला टी-20 विश्वचषक सामना लंडनमधील ऐतिहासिक लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर खेळला जाईल.

भारत विरुद्ध आयर्लंड सामना सायंकाळी 6 वाजता (IST) सुरू होईल. तर, भारतीय महिला संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघ सामना सायंकाळी 7 वाजता (IST) सुरू होईल. या सामन्याची नाणेफेक सायंकाळी 6.30 वाजता होईल.

Comments are closed.