दिवा लावून सात फेरे घेतले; पॉवरच्या गोळ्या घेऊन बनला हैवान, गर्लफ्रेंडचा जीव घेतल्यानंतरही थांब

इंदौर: इंदौर येथे एमबीए शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीच्या हत्या प्रकरणात आरोपी पियूष धामनोदिया याने पोलिस चौकशीत नवे दावे केले आहेत. त्याच्या म्हणण्यानुसार, तो आपल्या प्रेयसीशी (indore Crime News) विवाह करू इच्छित होता; मात्र त्याच्या कुटुंबीयांचा या नात्याला विरोध होता. त्याने असेही सांगितले की, दोघांनी खोलीत गुपचूप सात (indore Crime News) फेरे घेतले होते. तरुणी त्याच्यावर सार्वजनिकरीत्या विवाहाची कबुली देण्यासाठी दबाव टाकत होती. त्याचवेळी तिच्या चारित्र्यावर संशय आल्याने संतापातून आपण हत्या केल्याचे त्याने आपल्या जबाबात म्हटले आहे.(indore Crime News)

डीसीपी झोन-१ कृष्ण लालचंदानी (Krishna Lalchandani) यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदसौर येथील पियूषची ओळख संबंधित विद्यार्थिनीशी मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. दोघेही एकाच महाविद्यालयात एमबीएचे शिक्षण घेत होते. पियूषला तिच्याशी विवाह करायचा होता; मात्र त्याचे कुटुंबीय तयार नव्हते. जानेवारी महिन्यात त्याने खोलीत दिवा लावून तरुणीला मंगळसूत्र घातले आणि सात फेरे घेतल्याचा दावा केला आहे. मात्र तरुणीला हा संबंध सर्वांसमोर मान्य व्हावा, अशी अपेक्षा होती. आरोपीने चौकशीत असेही सांगितले की, ती इतर मुलांशी ऑनलाईन बोलत असल्याचा त्याला संशय होता.(indore Crime News)

मोबाईल हॅक करून खासगी चॅट वाचल्याचा दावा

तपासात समोर आले की, पियूषला तिच्यावर संशय येऊ लागला होता. त्याने तिचा मोबाईल हॅक करून खासगी चॅटिंग वाचल्याचा दावा केला आहे. डेटिंग अॅपवरून ती इतरांशी संवाद साधत असल्याचे त्याला दिसल्याचे तो म्हणतो. यानंतरच त्याने हत्या करण्याचे नियोजन केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

हात-पाय बांधून गळा आवळला

१० फेब्रुवारी रोजी आरोपीने तरुणीला खोलीवर बोलावले. दोघांमध्ये संवाद झाल्यानंतर आरोपीने जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप आहे. त्यानंतर ‘मस्करी’च्या नावाखाली तिचे हात-पाय बांधून छातीवर बसत गळा आवळला. ती वाचू नये म्हणून चाकूने वार केल्याचीही माहिती समोर आली आहे.

आत्मा बोलावण्यासाठी केले प्रयत्न

टीआय मनिष मिश्रा (Manish Mishra) यांच्या माहितीनुसार, मोबाईल जप्तीसाठी आरोपीला मुंबईला नेण्यात येणार आहे. तपासात असेही समोर आले की, आरोपीने मुंबईतील नालासोपारा भागात तरुणीची आत्मा बोलावण्यासाठी कथित धार्मिक विधी केले. यूट्यूबवरील व्हिडिओ पाहून फोटोसमोर फुले, मिठाई, हळद-कुंकू ठेवून तो काही क्रिया करत होता.

हत्येनंतर आत्महत्येचा विचार

आरोपीने पोलिसांना सांगितले की, हत्येनंतर त्याने आत्महत्या करण्याचा विचार केला होता. मुंबईत पुलावरून उडी मारण्याचा त्याचा विचार होता; मात्र तो धाडस करू शकला नाही. मुंबईत नोकरी शोधण्याचाही प्रयत्न त्याने केल्याचे समोर आले आहे.

लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्यांचे सेवन

चौकशीत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपीने लैंगिक क्षमता वाढवणाऱ्या गोळ्या घेतल्याची कबुली दिली आहे. १० फेब्रुवारी रोजी त्याने द्वारकापुरी परिसरातील आपल्या खोलीवर तरुणीला ‘व्हॅलेंटाईन वीक’ निमित्त भेट देण्याचे आमिष दाखवून तिला बोलावले. आधी तिला खायला देऊन, डोळ्यावर पट्टी बांधण्याच्या बहाण्याने हात-पाय बांधले आणि त्यानंतर जबरदस्ती केल्याचा आरोप आहे. विरोध केल्यावर तिच्या तोंडात कापड कोंबून गळा दाबल्याचे तपासात नमूद आहे.

हत्येनंतरही खोलीतच थांबला

पोलिसांच्या माहितीनुसार, हत्या झाल्यानंतरही आरोपी सुमारे अडीच तास खोलीतच होता. या काळात त्याने मद्यप्राशन केले आणि मृतदेहासोबत अमानुष कृत्य केल्याचा आरोप आहे.

सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद

घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये आरोपीची ये-जा स्पष्ट दिसून आली आहे. तो तरुणीसोबत खोलीत प्रवेश करताना आणि नंतर बॅग घेऊन बाहेर पडताना दिसत आहे. पोलिसांच्या मते, ही संपूर्ण घटना पूर्वनियोजित असावी.

पोलिस कोठडीत चौकशी सुरू

द्वारकापुरी पोलिसांनी आरोपीला रिमांडवर घेतले असून सखोल चौकशी सुरू आहे. आरोपी चौकशीत वारंवार जबाब बदलत असला तरी तांत्रिक पुरावे आणि वैद्यकीय अहवालातून महत्त्वाचे तपशील पुढे आले आहेत. अधिकाऱ्यांच्या मते, आरोपीने संबंधासाठी दबाव टाकल्याची आणि विरोध केल्यावर हत्या केल्याची कबुली दिली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.