आम्हाला तिकडे लावलेली पाटी दिसली असती तर…. कुंडमळा दुर्घटनेतील जखमींनी नेमकं काय सांगितलं?

पुणे: पुण्यातील कुंडमळा येथे (Indrayani Kundmala bridge collapse) झालेल्या दुर्घटनेत 51 जखमी झाले आणि त्यांच्यावर तळेगाव मधील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे त्यातीलच अथर्व रुग्णालयात काही जणांवर उपचार सुरू आहेत.  कुंडमळ्याच्या (Indrayani Kundmala bridge collapse) ठिकाणी पूल धोकादायक असल्याची कोणतीही पाटी आम्हाला दिसली नाही ती जर पाटी मोठी असती तर आम्हाला दिसली असती. सोबतच पुलावर एकाच वेळी दोन्ही कडून दोन गाड्या आल्यात आणि त्यामुळे अख्खा फूल जाम झाला. पुलावर लोड आला आणि त्यामुळे पूल कोसळला, अशा भावना जखमी पर्यटकांनी व्यक्त केली आहे. सोबतच दिल्लीहून आलेल्या एका पर्यटकांनी देखील पुलावर लोड आल्याने हा पूल कोसळल्याचा बोलून दाखवले आणि या दुर्घटनेला कोणालाही जबाबदार धरता येणार नाही. पर्यटकांनी धोका असलेली पाटी वाचली नाही, असंही जखमींच म्हणणं आहे.

कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर काही प्रश्न उपस्थित होतात?

– इंद्रायणी नदीवरचा पूल कमकुवत झाल्यानं त्यावरून ये-जा करण्यास मनाई होती, मग पर्यटक पुलावर कसे काय चढले?
– पर्यटकांनी पुलावर जाऊ नये म्हणून प्रशासनाने कोणाला जबाबदारी दिली होती? अन् ते रविवारी कुठं होते?
– हा पूल दीड वर्षांपूर्वी वापरासाठी बंद केला होता, तर तेंव्हापासून पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही?
– गेल्या दीड वर्षात नवा पूल उभारायला सुरुवात का झाली नाही?
– आता 10 जूनला टेंडर आणि वर्क ऑर्डर काढल्याचा दावा आहे, पण गेली दीड वर्ष ही दिरंगाई कोणामुळं?

इंद्रायणी पूल दुर्घटनेत वाचलेल्या योगेशने काय सांगितलं?

मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (16 जून) दुपारी इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत चार पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, 51 पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. या अपघातातून योगेश आणि शिल्पा भंडारे या पती-पत्नीने थोडक्यात जीव वाचवला आहे. दोघांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगेश भंडारे हे पुण्यातील खराडी परिसरात राहतात आणि एका बँकेत नोकरी करतात. रविवारी ते आपल्या पत्नीसोबत कुंडमळा येथे पर्यटनासाठी गेले होते. पूल कोसळला, तेव्हा हे दोघंही पुलाच्या मध्यभागी होते. या क्षणांची आठवण सांगताना योगेश म्हणाले, “मृत्यू डोळ्यांदेखत पाहिला. पूल कोसळताना आम्ही मधोमध होतो. आमच्यासमोरच काही लोक वाहून गेले. लोकांना सावध करण्यात आलं होतं, पण कोणी ऐकलं नाही आणि हे सगळं घडलं.”

दुर्घटनेत नक्की किती जण नदीपात्रात पडले, याचा अचूक आकडा प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध नाही. सोमवारी सकाळी प्रांताधिकारी आणि तहसीलदारांनी घटनास्थळी भेट दिली. सध्या कोणतीही मिसिंग व्यक्तींची तक्रार प्राप्त नसली तरी शोध मोहीम सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे, हा पूल रहदारीसाठी बंद असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. अशा परिस्थितीतही पर्यटक या पुलावर गेले, हे बेजबाबदारपणाचे लक्षण असून, संबंधित बाबींची सखोल चौकशी सुरू असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. पावसाळ्यात बंद केलेल्या आणि धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असा इशारा प्रशासनाने पुन्हा दिला आहे.

https://www.youtube.com/watch?v=IW9M-XWFPYM

आणखी वाचा

Comments are closed.