मुंबईत राजकीय घडामोडींना वेग, जयंत पाटलांनी घेतली मंत्री उदय सामंतांची भेट, तब्बल दीड तास खलबतं

Jayant Patil Meet Uday Samant : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांची भेट घेतली आहे. जयंत पाटील आणि उदय सामंत यांच्या तब्बल दीड तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील नरीमन पॅाईट येथील एक्सप्रेस टॅावरमध्ये या दोन्ही नेत्यांची भेट झाली आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसापूर्वी ही भेट झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेवरूनच ही भेट झाल्याची माहीती आहे. या भेटीत काय राजकिय चर्चा झाली याची माहीती अद्याप गुलदस्त्यातच आहे. दरम्यान, सध्याच्या विविध मुद्यावरुन तापलेल्या राजकीय वातावरणात या दोन्ही नेत्यांची भेट महत्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील अद्यापही समोर आलेला नाही. त्यामुळं या दोन्ही नेत्यांनी याबाबत माहिती दिल्यावरच नेमकी काय चर्चा झाली याबाबत माहिती मिळणार आहे.

जयंत पाटलांनी चंद्रशेखर बावनकुळे यांचीही घेतली होती भेट

दरम्यान, गेल्या महिन्यात जयंत पाटील यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबईत भेट झाली होती. मागील एका महिन्यातील या दोन्ही महत्वाच्या नेत्यांची ही दुसरी भेट होती.. रात्री उशिरा मुंबईत ही त्यांची भेट झाली होती. त्यामुळं राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं होते.  दरम्यान, एका बाजुला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्या सुरु आहेत. अशातच आता दुसऱ्या बाजुला महायुतीतील महत्वाच्या पक्षाच्या प्रमुखाची आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या राज्याच्या प्रमुखांची भेट झाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारूतन मुक्त करण्याची जयंत पाटलांची शरद पवार यांच्याकडे मागणी

जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वतःला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात त्यांनी ही मागणी जाहीरपणे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे केली. या मागणीवर प्रतिक्रिया देताना शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले की, ‘मी प्रमुख सहकाऱ्यांशी चर्चा करून या मागणीवर विचार करेन.’ दुसरीकडे, जर जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्षपदावरून मुक्त केले, तर त्या जागी नेमकी कोणाची नियुक्ती केली जाणार? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

महत्वाच्या बातम्या:

दोन राष्ट्रवादी एकत्र लढण्याची चर्चा रंगली, जयंत पाटील काय म्हणाले? मुंबई मनपाच्या ठेवींवरूनही सरकावर हल्लाबोल

आणखी वाचा

Comments are closed.