IPL 2026 – “बॅटर त्याला ‘हलवा’ समजण्याची चूक करतात अन्…”, मुंबईच्या विजयानंतर श्रीकांत यांचे मोठे विधान
मुंबई इंडियन्स संघाने गेल्या 13 वर्षांपासून पहिला सामना गमावण्याची परंपरा यंदा मोडीत काढली आणि रविवारी वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दारूण पराभव केला. या लढतीमध्ये शार्दुल ठाकूर याने मुंबईकडून पदार्पण केले. पदार्पणाच्या लढतीतच त्याने आपली छाप सोडली आणि तीन विकेट्स घेतल्या. त्याच्या या दमदार कामगिरीचे हिंदुस्थानचे माजी कर्णधार के. श्रीकांत यांनी भरभरून कौतुक केले. फलंदाज शार्दुलला हलवा समजतात अन् हीच बाब त्याच्या पथ्यावर पडते, असे श्रीकांत म्हणाले.
Comments are closed.