हुश्श..! अखेर वरुणराजा बरसला, हलक्या ते मध्यम सरींमुळे मुंबईकरांना उकाड्यापासून दिलासा

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

छायाचित्र – गणेश पुराणिक

मुंबईसह संपूर्ण राज्याला चातकासारखी वाट पाहायला लावणाऱ्या मान्सूनचे आगमन झाले आहे. रविवारी सकाळी मुंबई शहर, उपनगर आणि नवी मुंबईतील काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी बरसल्या. यामुळे गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रविवारी पहाटेपासून मुंबईसह आसपासच्या भागांमध्ये पावसाची रिमझिम सुरू झाली. मुंबईतील वरळी, घाटकोपर, लोअर परळ, चेंबूर, मानखुर्द भागामध्ये सकाळी सहा ते सात या तासाभरामध्ये सरासरी 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे. सकाळी अचानक सुरू झालेल्या पावसामुळे कामावर निघालेल्या नोकरदारांची मात्र तारांबळ उडाली.

बातमी अपडेट होत आहे…

Comments are closed.