राज ठाकरेंची प्रेस संपताच मनसैनिकांचं खळखट्याक सुरु, हिंदी भाषेची पुस्तकं फाडून पेटवून दिली
हिंदी सक्तीवर राज ठाकरे: राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिलीपासून तिसऱ्या भाषेच्या माध्यमातून हिंदी भाषेची सक्ती करुन पाहणाऱ्या महायुती सरकारवर मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) तुटून पडले आहेत. राज ठाकरे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेत मनसे राज्यात हिंदीची (Hindi) सक्ती करुन देणार नाही. राज्य सरकारने धोरण बदलले नाही तर संघर्ष अटळ असेल, त्याला मनसे (MNS) जबाबदार राहणार नाही. या इशाऱ्याला राज्य सरकार आव्हान समजत असेल तर समजावे, अशी गर्जना राज ठाकरे यांनी केली. राज ठाकरे यांच्या या पत्रकार परिषदेनंतर मुंबईत लगेचच पडसाद उमटताना दिसले. (Maharashtra School Hindi Language Compulsion)
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतनंतर मनसे सैनिक आक्रमक झाले. मनसेचे सरचिटणीस मनोज चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत हिंदी भाषेच्या पुस्तकाची होळी करण्यात आली. यावेळी मनसैनिकांनी हिंदी पुस्तकांचे पहिले आणि शेवटचे पान फाडून ते जाळून चाकले. महाराष्ट्रात हिंदीची सक्ती चालणार नाही, असे मनसे सरचिटणीस मनोज चव्हाण यांनी सांगितले. राज ठाकरेंच्या या पत्रकार परिषदेनंतर हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्धच्या आंदोलनाचे लोण राज्यभरात पसरण्याची शक्यता आहे. राज्यातील शाळा नुकत्याच सुरु झाल्या आहेत. त्यामुळे आता शाळांकडून पहिलीपासूनच्या विद्यार्थ्यांना हिंदी विषय शिकवला जाणार का?, हे बघावे लागेल. बाजारपेठेत हिंदीची पुस्तकं विकलीच कशी जातात आणि शाळांमध्ये हिंदी शिकवलीच कशी जाते, हे आम्ही बघू, असा इशाराच राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे शाळांमध्ये हिंदी शिकवण्याबाबत मनसे आक्रमक झाल्यास राज्य सरकार काय भूमिका घेणार, हे पाहावे लागेल. हिंदी भाषेविरुद्ध आक्रमक झालेल्या मनसेविरोधात पोलिसांनी कारवाई केल्यास हे आंदोलन आणखीच भडकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राज्य सरकार हा प्रश्न कसा हाताळणार, हे पाहावे लागेल.
Raj Thackeray: उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांच्या लॉबीचा हिंदी सक्तीसाठी दबाव: राज ठाकरे
हिंदी भाषा सक्तीचा विषय येत नाही. उत्तरेत काही राज्यात ही भाषा वापरली जाते. त्यांना त्यांची स्थानिक बोली भाषा संपवू द्यायची नाही. सध्या कागदी घोडे नाचवत आहे. जर भाषा सक्ती नाही तर मग पुस्तक छपाई कशासाठी करत आहात? उत्तरेतील लोकांना सुसंस्कृत महाराष्ट्र काबीज करायचा आहे त्यासाठी भाषा सक्ती केली जात आहे. उत्तरेतील आयएएस अधिकाऱ्यांना मुंबईत सहज काम करता यावे, यासाठी विशिष्ट लॉबीच्या माध्यमातून त्रिभाषा धोरणाच्या नावाखाली हिंदी भाषेच्या सक्तीचे धोरण रेटले जात आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला.
https://www.youtube.com/watch?v=bftharrqjwq
आणखी वाचा
शिक्षण कर्जाची माहिती:
शिक्षण कर्जाची गणना करा ईएमआय
आणखी वाचा
Comments are closed.