Priyanka Gandhi On CJP Protest : पोलिसांच्या ताब्यातून सुटका, प्रियांका गांधींची पहिली प्रतिक्रिया

दिल्ली पोलिसांनी सुटका केल्यानंतर प्रियांका गांधी म्हणाल्या की विद्यार्थी आपलीच मुलं आहेत, ते देशाचे भविष्य आहेत, त्यांची बाजू ऐकण्यात सरकारला काय अडचण होती.  विद्यार्थी एका योग्य मुद्यासह आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांसोबत जे घडलं त्याच्या रागातून आंदोलन करण्यात आलं. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत, विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडणं आमची जबाबदारी आहे.  लोकशाहीत आंदोलन करण्याचा मुलभूत अधिकार असल्याचं प्रियांका गांधी म्हणाल्या.  

आपल्याला शिक्षणची व्यवस्था जी मोडकळीस आलेली आहे ती दुरुस्त करायची आहे. त्यासाठी मोठी चर्चा झाली पाहिजे, यामुळं धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यायला पाहिजे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. संसदेत चर्चा झाली पाहिजे, विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यांचे मुद्दे ऐकून घेतले पाहिजेत, असं देखील प्रियांका गांधी यांनी म्हटलं. वंदे मातरमच्या सन्मानाचं बिल सरकार आणतेय, आपली मातृभूमी लोकशाही आहे, ही मुलं कोण आहेत, त्यांनीच आम्हाला संसदेत पाठवलं आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या.   

Comments are closed.