करिअर वाचवण्यासाठी पृथ्वी शॉचा धाडसी निर्णय, स्वतःची टीमच सोडली; एक-दोन नाही तर मिळाल्या इतक्या

पृथ्वी शॉ सोडा मुंबई बातम्या: पृथ्वी शॉ सध्या वाईट काळातून जात आहे, तो केवळ टीम इंडियामधूनच नाही तर मुंबईने त्याला रणजी ट्रॉफीमधूनही वगळले आहे. त्याला आयपीएलमध्येही संधी मिळाली नाही. आता असे वृत्त आहे की, तो आपली कारकीर्द वाचवण्यासाठी मुंबई क्रिकेट संघ सोडून दुसरीकडे जाणार आहे.

मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवायचा झाला तर, पृथ्वी शॉने दुसऱ्या राज्यातून क्रिकेट खेळण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून ना हरकत प्रमाणपत्र मागितले आहे. गेल्या वर्षी मुंबई क्रिकेट निवड समितीने पृथ्वी शॉला संघातून वगळले होते. पृथ्वी शॉला वजन कमी करण्याचा सल्लाही देण्यात आला होता. दरम्यान आता वृत्तांनुसार, त्याने मुंबई संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला 2 ते 3 राज्य संघांकडून खेळण्याची मोठी ऑफर मिळाली आहे.

करिअर वाचवण्यासाठी पृथ्वी शॉचा धाडसी निर्णय

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला या वृत्ताची पुष्टी केली आणि सांगितले की, ‘पृथ्वी शॉने आमच्याकडून एनओसी मागितली आहे आणि आम्ही लवकरच त्यावर निर्णय घेणार आहोत.’ खराब तंदुरुस्तीमुळे पृथ्वी शॉ मुंबईच्या विजय हजारे ट्रॉफी आणि रणजी ट्रॉफी संघाचाही भाग नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला त्याच्या तंदुरुस्तीवर काम करण्याचा सल्ला दिला होता. वृत्तांनुसार, शॉला 2 ते 3 वेगवेगळ्या राज्यांच्या संघांकडून खेळण्याच्या ऑफर मिळाल्या आहेत. खराब तंदुरुस्तीमुळे तो भारतीय संघाबाहेरही होता. अलिकडेच तो त्याच्या फिटनेसवर काम करताना दिसला आहे.

पृथ्वी शॉ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे

अलीकडेच, पृथ्वी शॉ मुंबई टी-20 लीगमध्ये खेळताना दिसला. जिथे त्याने कर्णधार म्हणूनही शानदार खेळी केली. आयुष म्हात्रे आणि यशस्वी जैस्वाल यांच्याव्यतिरिक्त, आता मुंबई संघात सलामी फलंदाजीसाठी अंगकृष रघुवंशीचा पर्याय देखील आहे. ज्यामुळे शॉला खेळण्याची संधी मिळत नाही. अशा परिस्थितीत, आता पृथ्वी शॉला विश्वास आहे की त्याला दुसऱ्या राज्याच्या संघात खेळण्याची संधी मिळू शकते. अशा परिस्थितीत, तो आता त्याच्या कारकिर्दीत पुढे जाऊ इच्छितो.

हे ही वाचा –

Eng vs Ind 1st Test : ऋषभ पंत पुरता फसला, शुभमन गिलच्या काळ्या मोजेनंतर चेंडूवरून राडा, ICC उपकर्णधारावर घालणार बंदी?

आणखी वाचा

Comments are closed.