दावोसमध्ये अदानी, लोढांसारख्या स्थानिक कंपन्याबरोबर करार हा एक क्रूर विनोद : पृथ्वीराज चव्हाण
पृथ्वीराज चव्हाण : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर (Devendra Fadnavis At Davos) टीका करणे योग्य नाही. जर खरोखर 30 लाख कोटींचे मीओ!आपण (MoU) झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक (Iगुंतवणूक) येणे आवश्यक आहे. पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच. असं म्हणत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्र्यांच्या दावोस दोऱ्यावर भाष्य केलं आहे. सोबतच दावोसमध्ये अdani (अदानी समूह) आणि लोढा (Lodha) यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. अशी बोचरी टीकाहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. (देवेंद्र फडणवीस दावोस येथे)
पृथ्वीराज चव्हाण : स्थानिक कंपनी बरोबार दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद
दरम्यानमागील दावोस दौऱ्यातील MoU पैकी महाराष्ट्रात किती उद्योग सुरू झाले? किती गुंतवणूक झाली? प्रत्यक्षात किती रोजगार निर्माण झाले? मोठे आकडे नव्हे, तर प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यातून होणारी रोजगारनिर्मिती महत्त्वाची आहे. आपल्याच राज्यातील कंपन्यावरोबर दाव्होस मध्ये MoU करण्याबद्दल कर्नाटक सरकारच्या उद्योगमंत्री एम. बी. पाटील यांचे निरीक्षण महत्वाचे आहे. ते म्हणतात कि आम्ही दावोससारख्या आंतरराष्ट्रीय मंचावर कर्नाटक किंवा भारतीय कंपन्यांशी MoU करत नाही, तर फक्त परकीय गुंतवणुकदारांशी करार करतो. म्हणूनच कर्नाटकात परकीय उद्योग येतात आणि कर्नाटकाचे दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. अडाणी आणी लोढा यांच्या सारख्या स्थानिक कंपन्याबरोबर दावोसमध्ये करार करणे हा एक क्रूर विनोद आहे. अशी बोचरी टीकाहे पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटींचे MoU झाले असतील, तर आंनदाची बाब आहे. राज्याच्या प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यक आहे.
पण मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही. कारण सत्य शेवटी बाहेर येतेच.
मागील…– पृथ्वीराज चव्हाण (@prithvrj) 24 जानेवारी 2026
Prithviraj Chavan on Devendra Fadnavis : महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले? मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का?
महाराष्ट्राच्या बेरोजगार युवकांना इव्हेंट नकोत, तर पारदर्शकता, उत्तरदायित्व व प्रत्यक्ष रोजगार हवे आहेत. आत्तापर्यंतच्या दावोसमध्ये घोषणा केलेल्या MoU वर आणि त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रात किती मोठे परकीय उद्योग सुरू झाले? यावर मुख्यमंत्री श्वेतपत्रिका काढतील का? असा प्रश्न हे पृथ्वीराज चव्हाण यांनी च्याला आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.