आयुष म्हात्रे 9, अजिंक्य राहणे 2, सरफराज खानही फेल! मुशीर खानने मुंबईची लाज राखली, ठोकले शतक
मुंबई विरुद्ध हिमाचल प्रदेश रणजी ट्रॉफी 2025 : शनिवारी 8 नोव्हेंबर रणजी ट्रॉफीच्या चौथ्या फेरीतील मुंबई आणि हिमाचल प्रदेश यांच्यात सामना रंगला आहे. बीकेसी मैदानावर खेळल्या जात असलेल्या या सामन्यात मुंबईची टॉप ऑर्डर फलंदाजांनी निराशा केली, मात्र तरुण मुशीर खानने जबाबदारी स्वीकारत शतक झळकावले आणि संघाची लाज राखली.
मुंबईची खरब सुरू होते, पण ओलावा राखाडी काकण क्लॅरी)
मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली, परंतु सुरुवात अत्यंत खराब झाली. सलामीवीर आयुष म्हात्रे फक्त 9 धावांवर माघारी परतला, तर अनुभवी अजिंक्य राहणे 2 धावांवर बाद झाला. चाहत्यांना मोठ्या अपेक्षा असलेल्या सरफराज खानलाही या सामन्यात यश मिळाले नाही, तो लवकरच बाद झाला. तीन प्रमुख विकेट्स स्वस्तात गेल्यानंतर मुंबई अडचणीत सापडली होती, परंतु मुशीर खानने संयमी आणि तितकीच दमदार फलंदाजी करत शतक झळकावले.
रणजी ट्रॉफीत मुशीर खानसाठी शंभर..!!! 🫡
– फलंदाजीची सुरुवात करताना, मुंबईने 4 विकेट्स गमावल्या आणि मुशीरने हिमाचल प्रदेशविरुद्ध उल्लेखनीय शतक ठोकले, ही या तरुणाची शानदार खेळी आहे. pic.twitter.com/xSMdDtdHMx
– जॉन्स. (@CricCrazyJohns) ८ नोव्हेंबर २०२५
हिमाचलविरुद्धच्या सामन्यात मुशीरने 86 चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले आणि नंतर 148 चेंडूंमध्ये शतक गाठले. त्याने आपल्या खेळीत 12 चौकार लगावले. बातमी लिहीपर्यंत मुंबईने 61 षटकांत 4 बाद 217 धावा केल्या होत्या. मुशीर खान नाबाद 101 तर सिद्धेश लाड 78 धावांवर खेळत होते. याआधी राजस्थानविरुद्धच्या सामन्यातही मुशीरने पहिल्या डावात 49 आणि दुसऱ्या डावात 63 धावांची खेळी केली होती.
मुशीर खानचे शतक. @sportstarweb pic.twitter.com/2kDOmeD4fQ
— शायन आचार्य (@ShayanAcharya) ८ नोव्हेंबर २०२५
सरफराज खान पुन्हा अपयाशी (सरफराज खान रणजी ट्रॉफी २०२५ मध्ये अयशस्वी)
मुशीरचा मोठा भाऊ सरफराज खानचा मात्र फॉर्म चिंताजनकच ठरत आहे. हिमाचलविरुद्धच्या सामन्यात तो 57 चेंडूंमध्ये 16 धावा करून बाद झाला. राजस्थानविरुद्धही त्याचे बॅट चालले नाही. पहिल्या डावात 15 आणि दुसऱ्या डावात केवळ 5 धावा करून तो बाद झाला होता. या हंगामात रणजी ट्रॉफीमध्ये सरफराजचे सर्वोच्च व्यक्तिगत धावसंख्येचे आकडे फक्त 42 आहेत. भारतीय संघात पुनरागमनाची संधी शोधणाऱ्या सरफराजसाठी हा फॉर्म चिंतेचा विषय ठरत आहे. तर दुसरीकडे, मुशीर खान मात्र सातत्यपूर्ण कामगिरीने मुंबईसाठी आशेचा किरण बनला आहे.
सरफराज खान बाद झाला, फलंदाजासाठी आणखी एक निराशाजनक मोहीम. मुंबईने चौथी विकेट गमावली. @sportstarweb
— शायन आचार्य (@ShayanAcharya) ८ नोव्हेंबर २०२५
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.