परभणीत शक्तिपीठ जमीन मोजणी तात्पुरती स्थगित; तरीही आज रास्ता रोको, प्रशासनाच्या दंडेलशाहीचा करण

शक्तीपीठ महामार्ग आंदोलन : परभणीत शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Highway) प्रकल्पासाठी सुरू असलेली जमीन मोजणी तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर (Meghna Bordikar) यांनी घेतला आहे. मात्र मोजणी थांबवली असली तरी शेतकरी व विविध पक्ष-संघटनांनी जाहीर केलेली आंदोलने नियोजित वेळापत्रकानुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रशासनाच्या निर्णयानंतरही आंदोलन मागे घेण्यात आलेले नसून सोमवारी सकाळी परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन होण्याची शक्यता आहे.

Shaktipeeth Highway Protest: आंदोलन एकत्र करण्याचा निर्णय

पूर्वी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन होणार होते. शक्तिपीठ बाधित शेतकरी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा व इतर संघटनांचा पोखरणी येथे रस्ता रोको करण्याचा निर्णय होता. तर उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव यांच्या नेतृत्वाखाली सिंगणापूर येथे आंदोलन होणार होते. मात्र दोन ठिकाणी आंदोलन करण्याऐवजी आता सर्व संघटना एकत्र येऊन सकाळी 10 वाजता सिंगणापूर फाट्यावर सर्वपक्षीय रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Shaktipeeth Highway Protest: शक्तीपीठ महामार्गाविरोधात राज्यव्यापी आंदोलन

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर झालेल्या कथित पोलिसी अत्याचाराच्या निषेधार्थ तसेच शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी सोमवारी (ता. २३) राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय शक्तिपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या राज्यव्यापी बैठकीत घेण्यात आलाय. विधानसभेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील विविध भागांत मोर्चे, धरणे, निदर्शने आणि रास्ता रोको आंदोलने करण्यात येणार आहेत.

Shaktipeeth Highway Protest: नेत्यांचे सरकारवर आरोप

शक्तिपीठ महामार्गावरून अनेक नेत्यांनी सरकारवर टीका केली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी महामार्ग प्रकल्पात मोठ्या भ्रष्टाचाराचा आरोप करत सरकारला हा प्रकल्प रद्द करावा लागेल, असा इशारा दिला. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी हा महामार्ग अनावश्यक असून कंत्राटदारांच्या फायद्यासाठी रेटला जात असल्याचा आरोप केला. तर कैलास पाटील यांनी ग्रामसभांमधून पुन्हा ठराव घेण्याचे आवाहन केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Rohini Khadse on Ajit Pawar Death Plane Crash : आमचे रोहितदादा पाठपुरावा करताय, पण अधिवेशनात अजितदादांच्या मृत्यूबाबत सर्वपक्षीय आमदारांनी सरकारला जाब विचारावा; रोहिणी खडसेंची मागणी

Saamana Agralekh : फडणवीस-मिंधेंच्या सरकारमध्ये सुईच्या अग्राएवढीही जमीन पांडवांना न देणाऱ्या दुर्योधनाचा अहंकार; ‘सामना’च्या अग्रलेखातून सत्ताधाऱ्यांवर प्रहार

आणखी वाचा

Comments are closed.