अंबानी मधे पडले नसते तर गणेश नाईकांना पालकमंत्रिपद मिळालं नसतं; शिंदेंच्या शिलेदाराचा पलटवार

मुंबई : आमच्या अनाथांचे नाथ एकनाथ शिंदे आहेत म्हणून मी हा टी शर्ट घातला आहे. अनाथांचा नाथ एकनाथ. आम्ही 12 महिने निवडणुकीला तयार असतो, त्यामुळं यंदा हंडीवर पालिका निवडणुकीची छाप आहे असं म्हणता येणार नसल्याचे वक्तव्य शिवसेना शिंदे गटाचे नेते विजय चौगुले यांनी केलं. गणेश नाईक म्हणाले एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. माझं त्यांना सांगणं आहे की तुम्हाला पालकमंत्री पदाची लॉटरी मुकेश अंबानीमुळं लागली. मुकेश अंबानी मधे पडले नसते तर त्यांना पालकमंत्रीपद मिळाल नसतं, असी टीका विजय चौगुले यांनी केली. यंदाच्या निवडणुकी आमची पालिकेत असणारी ताकद दाखवून देऊ असेही विडय चौगुले म्हणाले.

गणेश नाईकांचं वय झालंय, खासदार नरेश म्हस्केंचा टोला

गणेश नाईक ( Ganesh Naik)  यांचं वय झालं आहे, त्यामुळे ते आम्हाला लॉटरी लागली म्हणत असतील. परंतू, एकनाथ शिंदे यांना कधीही लॉटरी लागली नाही. त्यांनी मेहनतीने सगळं मिळवल्याचे वक्तव्य शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी केलं. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागल्याचे वक्तव्य गणेश नाईक यांनी केलं होतं. त्यांच्या या वक्तव्यावर नरेश म्हस्के यांनी आल पलटवार केला आहे. 40 जणांना सोबत घेऊन जाण्याची हिंमत केवळ एकनाथ शिंदे यांच्यातच आहे. गणेश नाईक यांचं वय झालं आहे त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्य करत असल्याचे म्हस्के म्हणाले.

शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आमच्याशी संपर्क साधलाय

नवी मुंबईत वातावरण बदललं आहे. आगामी पालिका निवडणुकीत आम्ही महायुती म्हणून सामोरे जाणार आहोत. समविचारी पक्षांना सोबत घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने देखील आमच्याशी संपर्क साधला आहे.

नेमकं काय म्हणाले होते गणेश नाईक?

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे असा टोला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. पालघरमधील दुर्वेश येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी गणेश नाईक बोलत होते. लॉटरी प्रत्येकाला लागत नाही. मात्र, लागलेल्याने ती योग्य टिकवली पाहिजे, असं सांगत गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांना चिमटा काढला.

प्रत्येकाचे नशीब आहे. एकनाथ शिंदे यांना लॉटरी लागली आनंदीची गोष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले. पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे. किती कमवलं आणि कसं कमवलं आणि किती टिकवलं हे महत्वाचं असल्याचे गणेश नाईक म्हणाले. यावर्षी 10 कोटी झालं लावण्याचे उद्दीष्ट असल्याचे गणेश नाईक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

एकनाथ शिंदेंना लॉटरी लागली, पण कमवलेलं टिकवता आलं पाहिजे, वनमंत्री गणेश नाईकांचा टोला

आणखी वाचा

Comments are closed.